शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरला ५५१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 01:13 IST

बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ५५१ जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या धूम धडाक्यात बोईसरला संपन्न झाला.

- पंकज राऊत बोईसर : आधार प्रतिष्ठान, शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ५५१ जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या धूम धडाक्यात बोईसरला संपन्न झाला.इराणी वाडी ग्राऊंडवर आयोजिलेल्या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख आणि आमदार रविंद्र फाटक, पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित, आधार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष-सचिव जगदिश धोडी, पालघर जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख वसंत चव्हाण, पालघर जिल्ह्याचे शिवसेना समन्वय प्रभाकर राऊळ, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, पालघर जिल्ह्याच्या शिवसेना महिला संपर्क संघटक दीपा पाटील, पालघर जिल्ह्याचे शिवसेना युवा अधिकारी राकेश पाटील, शिवसेना पालघर विधानसभा संघटक वैभव संखे, आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेन्द्र सिंग, पालघर तालुका प्रमुख (पालघर व डहाणू विधानसभा) अशोक भोईर, जिल्हा परिषद सदस्य रंजना संखे, मिताली राऊत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र संखे, साळुंखे व वीणा देशमुख, विदूर पाटील, वैदही वाढण आदी मान्यवर उपस्थित होते. त्याच बरोबर पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागातील बहुसंख्य आदिवासी जोडपी व त्यांचे नातेवाईक तसेच त्यांच्या गावातील वºहाडी मोठ्या प्रमाणात या सोहळ्यात सहभागी झाले होते.आधार प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार आदिवासी जोडप्यांचा विवाह पार पाडले असून अनेक वर्षांपासून त्यामार्फत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तसेच दारिद्र्यरेषेखालील गरजूंचा विवाह सोहळा थाटात साजरा केला जात असून प्रत्येक वर्षी वधू-वरांना संसारास लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात येते. जगदीश धोडी यांनी या विवाह सोहळ्यात पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोरगरीब सहभागी होत असून प्रत्येक वर्षी संख्या वाढत आहे. असे सांगितले तर हा सोहळा सामाजिक उपक्रम असून कर्ज न काढता येथे लग्न कार्य होते तर लग्नानंतर होणाºया मुलांना शाळेत पाठवा. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका दारूने समाज बिघडवतो. म्हणून दारूपासून लांब राहा, असे खासदार गावित यांनी सांगितले.लग्न करण्यासाठी संपूर्ण गावाला भरपूर दारू पाजून मांसाहारी जेवण देणे आदिवासी समाजात अनिवार्य असते, त्यासाठी प्रचंड खर्च येतो तेवढा पैैसा जवळ नसल्याने अनेक आदिवासी कर्ज काढून त्या बदल्यात लगीन गडयाची वेठबीगारी पत्करतात म्हणजे कर्ज फिटेपर्यत त्या नवरा बायकोने कर्ज देणाºयाकडे वेठबिगार म्हणून राबायचे अशी घातक प्रथा या समाजात आहे. तिचे उच्चाटन या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या रूपाने घडवून आणले जाते आहे.

टॅग्स :marriageलग्न