शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वसईत बोगस बाटलीबंद पाण्याचा धंदा जोरात; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:18 IST

नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जातोय खेळ

पारोळ/नालासोपारा : वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली बोगस धंदा सुरू असून मागील वर्षी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने ५१ पाणी विक्रेत्यांवर गुन्हा नोंद केला होता. तरीही आजही अनेक ठिकाणी असे कारखाने सुरू असून या बाटलीबंद पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तालुक्यातील अनेक पाणी शुद्धीकरण प्रकल्पांतून फार्मासिस्ट मायक्रोबायोलॉजिकल पाणी शुद्ध तपासणी प्रयोगशाळाच गायब असल्याची माहिती मिळत आहे. वसई तालुक्यात कामण, सातिवली, धानीव, पेल्हार, वसई फाटा, बावखळ, विरारफाटा, शिरसाड, राजावली, जूचंद्र, बाफाने, वाकीपाडा अशा अनेक भागांत बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प सक्रिय आहेत. या प्रकल्पांत पाण्याची शुद्धता तपासण्याची यंत्रेच गायब आहेत. पाणी शुद्धतेसाठी पाण्यावर १४ प्रक्रिया व २२ प्रकारच्या चाचण्या करण्याचा नियम या प्रकल्पांत पायदळी तुडवला जात आहे. याबाबत अन्न आणि प्रशासन विभाग उदासीन असल्याने वसईत बाटलीबंद धंद्याला जोर चढला आहे.

अशुद्ध पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये डिसल आॅक्सिजन, हार्डनेस पीएच, ओडर कलर, जिवाणूची स्थिती, पाण्यातील जडपणा, आदींचा समावेश असतो. या प्रकल्पांत प्रयोगशाळा हाताळणारी जबाबदार व्यक्ती गरजेची असते, तसेच पाण्यातील क्षार, विषाणू, घातक द्रव्य बाजूला काढण्याचे निकष अत्यंत कडक आहेत. मात्र हे नियम पाळले जात असल्याचे दिसून येत नाही. हा बोगस धंदा करताना ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी बाटलीची पॅकिंग मात्र चांगल्या दर्जाची केली जाते.

महानगरपालिका हद्दीतील ज्याज्या परिसरात अनधिकृत पाण्याचे प्लाण्ट आहेत, त्यांच्यावर लवकरच कारवाई करून संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील. या आधीही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.- सुखदेव दरवेशी, आरोग्य अधिकारी, वालीव प्रभाग, वसई-विरार महानगरपालिका

टॅग्स :Waterपाणी