शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

वसईत बोगस बाटलीबंद पाण्याचा धंदा जोरात; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:18 IST

नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जातोय खेळ

पारोळ/नालासोपारा : वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली बोगस धंदा सुरू असून मागील वर्षी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने ५१ पाणी विक्रेत्यांवर गुन्हा नोंद केला होता. तरीही आजही अनेक ठिकाणी असे कारखाने सुरू असून या बाटलीबंद पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तालुक्यातील अनेक पाणी शुद्धीकरण प्रकल्पांतून फार्मासिस्ट मायक्रोबायोलॉजिकल पाणी शुद्ध तपासणी प्रयोगशाळाच गायब असल्याची माहिती मिळत आहे. वसई तालुक्यात कामण, सातिवली, धानीव, पेल्हार, वसई फाटा, बावखळ, विरारफाटा, शिरसाड, राजावली, जूचंद्र, बाफाने, वाकीपाडा अशा अनेक भागांत बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प सक्रिय आहेत. या प्रकल्पांत पाण्याची शुद्धता तपासण्याची यंत्रेच गायब आहेत. पाणी शुद्धतेसाठी पाण्यावर १४ प्रक्रिया व २२ प्रकारच्या चाचण्या करण्याचा नियम या प्रकल्पांत पायदळी तुडवला जात आहे. याबाबत अन्न आणि प्रशासन विभाग उदासीन असल्याने वसईत बाटलीबंद धंद्याला जोर चढला आहे.

अशुद्ध पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये डिसल आॅक्सिजन, हार्डनेस पीएच, ओडर कलर, जिवाणूची स्थिती, पाण्यातील जडपणा, आदींचा समावेश असतो. या प्रकल्पांत प्रयोगशाळा हाताळणारी जबाबदार व्यक्ती गरजेची असते, तसेच पाण्यातील क्षार, विषाणू, घातक द्रव्य बाजूला काढण्याचे निकष अत्यंत कडक आहेत. मात्र हे नियम पाळले जात असल्याचे दिसून येत नाही. हा बोगस धंदा करताना ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी बाटलीची पॅकिंग मात्र चांगल्या दर्जाची केली जाते.

महानगरपालिका हद्दीतील ज्याज्या परिसरात अनधिकृत पाण्याचे प्लाण्ट आहेत, त्यांच्यावर लवकरच कारवाई करून संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील. या आधीही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.- सुखदेव दरवेशी, आरोग्य अधिकारी, वालीव प्रभाग, वसई-विरार महानगरपालिका

टॅग्स :Waterपाणी