शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वसईत बोगस बाटलीबंद पाण्याचा धंदा जोरात; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:18 IST

नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जातोय खेळ

पारोळ/नालासोपारा : वसई तालुक्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली बोगस धंदा सुरू असून मागील वर्षी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाने ५१ पाणी विक्रेत्यांवर गुन्हा नोंद केला होता. तरीही आजही अनेक ठिकाणी असे कारखाने सुरू असून या बाटलीबंद पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तालुक्यातील अनेक पाणी शुद्धीकरण प्रकल्पांतून फार्मासिस्ट मायक्रोबायोलॉजिकल पाणी शुद्ध तपासणी प्रयोगशाळाच गायब असल्याची माहिती मिळत आहे. वसई तालुक्यात कामण, सातिवली, धानीव, पेल्हार, वसई फाटा, बावखळ, विरारफाटा, शिरसाड, राजावली, जूचंद्र, बाफाने, वाकीपाडा अशा अनेक भागांत बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प सक्रिय आहेत. या प्रकल्पांत पाण्याची शुद्धता तपासण्याची यंत्रेच गायब आहेत. पाणी शुद्धतेसाठी पाण्यावर १४ प्रक्रिया व २२ प्रकारच्या चाचण्या करण्याचा नियम या प्रकल्पांत पायदळी तुडवला जात आहे. याबाबत अन्न आणि प्रशासन विभाग उदासीन असल्याने वसईत बाटलीबंद धंद्याला जोर चढला आहे.

अशुद्ध पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये डिसल आॅक्सिजन, हार्डनेस पीएच, ओडर कलर, जिवाणूची स्थिती, पाण्यातील जडपणा, आदींचा समावेश असतो. या प्रकल्पांत प्रयोगशाळा हाताळणारी जबाबदार व्यक्ती गरजेची असते, तसेच पाण्यातील क्षार, विषाणू, घातक द्रव्य बाजूला काढण्याचे निकष अत्यंत कडक आहेत. मात्र हे नियम पाळले जात असल्याचे दिसून येत नाही. हा बोगस धंदा करताना ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी बाटलीची पॅकिंग मात्र चांगल्या दर्जाची केली जाते.

महानगरपालिका हद्दीतील ज्याज्या परिसरात अनधिकृत पाण्याचे प्लाण्ट आहेत, त्यांच्यावर लवकरच कारवाई करून संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील. या आधीही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.- सुखदेव दरवेशी, आरोग्य अधिकारी, वालीव प्रभाग, वसई-विरार महानगरपालिका

टॅग्स :Waterपाणी