शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

सेनेने खाल्ली भाजपाची मते, कमळाची व्होट बँक फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:54 IST

आधीच्या डहाणू आणि सध्याच्या पालघर मतदारसंघातील सर्वच पक्षांची जवळपास अडीच लाख मते शिवसेनेने प्राप्त केल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय चित्रच साफ बदलून गेले आहे.

- नंदकुमार टेणीपालघर : आधीच्या डहाणू आणि सध्याच्या पालघर मतदारसंघातील सर्वच पक्षांची जवळपास अडीच लाख मते शिवसेनेने प्राप्त केल्यामुळे या मतदारसंघातील राजकीय चित्रच साफ बदलून गेले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात विजयाचे समिकरण पुन्हा कसे जुळवायचे हा प्रश्न सर्वच पक्षांना पडला आहे.डहाणू लोकसभा मतदारसंघ हा २००९ मध्ये पालघर झाला. त्यामध्ये काँग्रेस, राष्टÑवादी भाजपा, बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी असे ठरलेले ५ पक्ष होते. जेव्हा काँग्रेस आणि राष्टÑवादीची आघाडी व्हायची तेव्हा एक पक्ष कमी व्हायचा तर शिवसेना आणि भाजप यांची युती असल्यामुळे आणि पालघर व डहाणू हे जागावाटपात भाजपाकडे असल्याने शिवसेनेने येथे आपला उमेदवार उभा करण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही त्यामुळे येथील लढत चौरंगी अथवा तिरंगीच होत असे. डाव्यांचा आणि बविआचा प्रभाव जिल्हयातील ३-३ तालुक्यात असल्याने ही लढत शक्यतो तिरंगीच व्हायची अशा स्थितीत शिवसेनेने नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकीत आपला उमेदवार प्रथमच उभा करून या मतदारसंघातील मतांचे गणित आणि विजयाचे समिकरण बिघडवून टाकले आहे. त्यामुळे आता शिवसेना कुठल्या पक्षाची किती मते खाते याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. हे पाहता सेनेने सर्वाधिक मते भाजपची खाल्ली आहेत. त्यापाठोपाठ बविआ आणि डावे यांची मते वळविली आहेत. असे स्पष्ट होते. त्यामुळे आता या सर्वच पक्षांना आपल्या व्होटबँक अधिक मजबुत कराव्या लागणार आहेत. तसेच विजयाची समिकरणेही नव्याने जुळवावी लागणार आहेत.१४च्या भाजपाच्या मतात निम्मी मते होती शिवसेनेचीया पोटनिवडणुकीत प्रत्येक पक्षाला पडलेली मते पाहिली तर लक्षात येते की शिवसेनेने सर्वाधिक मते भाजपाची त्यानंतर काँग्रेस व त्यानंतर बविआची खाल्ली आहेत. वनगा यांना जी ५३३२०१ मते १४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळाली होती ती सर्वच भाजपाची नव्हती तर त्यात शिवसेनेची जवळपास निम्मी मते होती. म्हणूनच गावितांना यांना यावेळी २७२७८२ मते मिळाली. ५३३२०१ मधून ही २७२७८२ मते वजा केली तर उरतात २६०४१९ आणि वनगा यांना २४३२१० मते मिळाली आहेत. २०१४ मध्ये बविआच्या जाधव यांना २९३६८१ मते मिळाली आहेत ती यावेळी २३३८३८ झाली आहेत. म्हणजे त्यात ५९८४३ ची घट झाली आहे. तसेच १४ मध्ये येथे काँग्रेसचा उमेदवारच नव्हता तर डाव्यांच्या उमेदवाराने ७६८९० मते मिळविली होती. तर पोटनिवडणूकीत त्यांना ७१७८७ मते मिळाली आहेत याचा अर्थ ५१०९ एवढी त्यांची मते कमी झाली आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक