शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शेतकरी कायद्याविरोधातील 'भारत बंद'ला बविआचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 15:17 IST

पालघर जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे -  हितेंद्र ठाकूर

वसई - शेतकरी विरोधी कायद्याविरोधात नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. आज विरार येथे बहुजन  विकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला असल्याने मंगळवार 8 डिसेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. मागील  बारा दिवसापासून पंजाब,हरियाणा व महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेशीवर कूच करीत धडक मारली आहे.

दरम्यान केंद्र सरकार व शेतकऱ्यांची समन्वय समिती यांच्यामध्ये आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या ,परंतु या सर्व चर्चा सर्व स्थरावर निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांनी उद्या 8 डिसेंबर ला भारत बंदचे आवाहन केले आहे. परिणामी या भारत बंदला वसईचे आमदार तथा बविआ चे अध्यक्ष आम.हितेंद्र ठाकूर यांनी आज विरार स्थित आपल्या पक्ष कार्यालयात  आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती दिली आहे. एकूणच या बंद मध्ये आता राज्यातील सत्ताधारी व केंद्रतील विरोधी पक्ष सोबत पालघर जिल्ह्यातील बलाढय अशी बहुजन विकास आघाडी सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपVasai Virarवसई विरार