शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

विक्रमगडात हळव्याच्या कापणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:11 AM

तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने चांगली सुरुवात केली मात्र जून कोरडाच गेलाच त्याची भरपाई जुलै महिन्यात भरुन काढल्याने समाधानकारक असा पाऊस झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते

राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने चांगली सुरुवात केली मात्र जून कोरडाच गेलाच त्याची भरपाई जुलै महिन्यात भरुन काढल्याने समाधानकारक असा पाऊस झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु सप्टेंबरच्या मध्यापासून तालुक्यात पडणा-या सततच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडणीत सापडला होता, दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने तालुक्यातील विक्रमगड व परिसरात हळव्या भातपिकाच्या कापणीला जोमाने सुरुवात झाली आहे़त्यामुळे जर आता परतीचा पाऊस पुन्हा कोसळला तर तयार झालेले भातपिकाचे मोठयाप्रमाणवर नुकसान होणार आहे़ कारण शेतकरी कापलेले भात वाळविण्याकरीता शेतात कापून ठेवत असल्याने ते पुन्हा भिजल्यास तयार भाताला पुन्हा कोंब फुटून त्यांचे मोठे नुकसान होत होईल.यंदा तालुक्यात ७,५५८ अशा मोठया स्वरुपाच्या क्षेत्रावर हळवे,निमगरवे,गरवार भातपिकाची लागवड करण्यांत आली असून हळवे भातपिक ९० दिवसांत तयार झालेले असल्याने सद्यस्थितीत विक्रमगड व परिसरातील आंबेघर, बालापूर, दादडे, शेलपाडा, खडकी, सारशी, अंधेरी, ओंदे, विक्रमगड अशा आदीविध भागातील शेतक-यांनी भातकापणीला सुरुवात केली आहे. दसरा उत्सव पार पडल्यानंतर आपआपल्या सवडीनुसार व मनुष्यबळानुसार शेतकरी तिला सुरु करतातच़यंदाच्या लागवड क्षेत्रात हळवा भाताची रोपणी वेळेवर झाल्यामुळे दर्जेदार रोपे आली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़ परंतु यंदा पाउस लांबल्यामुळे काही शेतकºयांच्या भातावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता (ज्या शेतक-यांनी उशिराने भात लागवड) केली अशा). दरम्यान आतापर्यत तालुक्यात जून ते सप्टेेंबर अखेरीस एकुण सरासरी तीन हजार मि़मि़ पेक्षा जास्त पावसाची नोंद तहसिल कार्यालयात करण्यात आली आहे़

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी