शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

विक्रमगडात हळव्याच्या कापणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:11 IST

तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने चांगली सुरुवात केली मात्र जून कोरडाच गेलाच त्याची भरपाई जुलै महिन्यात भरुन काढल्याने समाधानकारक असा पाऊस झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते

राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने चांगली सुरुवात केली मात्र जून कोरडाच गेलाच त्याची भरपाई जुलै महिन्यात भरुन काढल्याने समाधानकारक असा पाऊस झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु सप्टेंबरच्या मध्यापासून तालुक्यात पडणा-या सततच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडणीत सापडला होता, दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने तालुक्यातील विक्रमगड व परिसरात हळव्या भातपिकाच्या कापणीला जोमाने सुरुवात झाली आहे़त्यामुळे जर आता परतीचा पाऊस पुन्हा कोसळला तर तयार झालेले भातपिकाचे मोठयाप्रमाणवर नुकसान होणार आहे़ कारण शेतकरी कापलेले भात वाळविण्याकरीता शेतात कापून ठेवत असल्याने ते पुन्हा भिजल्यास तयार भाताला पुन्हा कोंब फुटून त्यांचे मोठे नुकसान होत होईल.यंदा तालुक्यात ७,५५८ अशा मोठया स्वरुपाच्या क्षेत्रावर हळवे,निमगरवे,गरवार भातपिकाची लागवड करण्यांत आली असून हळवे भातपिक ९० दिवसांत तयार झालेले असल्याने सद्यस्थितीत विक्रमगड व परिसरातील आंबेघर, बालापूर, दादडे, शेलपाडा, खडकी, सारशी, अंधेरी, ओंदे, विक्रमगड अशा आदीविध भागातील शेतक-यांनी भातकापणीला सुरुवात केली आहे. दसरा उत्सव पार पडल्यानंतर आपआपल्या सवडीनुसार व मनुष्यबळानुसार शेतकरी तिला सुरु करतातच़यंदाच्या लागवड क्षेत्रात हळवा भाताची रोपणी वेळेवर झाल्यामुळे दर्जेदार रोपे आली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़ परंतु यंदा पाउस लांबल्यामुळे काही शेतकºयांच्या भातावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता (ज्या शेतक-यांनी उशिराने भात लागवड) केली अशा). दरम्यान आतापर्यत तालुक्यात जून ते सप्टेेंबर अखेरीस एकुण सरासरी तीन हजार मि़मि़ पेक्षा जास्त पावसाची नोंद तहसिल कार्यालयात करण्यात आली आहे़

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी