शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

साखरे पुलाचा पाया मातकट रेतीने

By admin | Updated: February 14, 2017 02:38 IST

या तालुक्यातील आदिवासी गाव-पाडयांना जोडणाऱ्या साखरे गावातील देहेर्जे नदीवर असलेल्या पुलाच्या पुर्नबांधणीत मातीमिश्रित

विक्रमगड : या तालुक्यातील आदिवासी गाव-पाडयांना जोडणाऱ्या साखरे गावातील देहेर्जे नदीवर असलेल्या पुलाच्या पुर्नबांधणीत मातीमिश्रित रेतीचा वापर होत असल्याने त्याच्या मजबुतीबाबतच शंका निर्माण झाली आहे. दुरावस्था झाल्याने त्याच्या पुर्नबांधणीची मागणी करण्यात आली होेती़ त्यानंतर ३१आॅक्टोंबर २०१५ रोजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी भूमीपूजन करुन देखील त्याचे काम रखडले होते़ याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिध्द करुन पाठपुरावा केला होता व अखेर त्याची दखल घेऊन शासनाने गेल्या एक महिनाभरापूर्वी या पूलाची पुर्नबांधणी करण्यास सुरुवात केली आहे़ हे काम आऱ के़ सावंत शहापूर यांना देण्यात आले आहे. सध्या पुलाच्या पायाचे काम चालू आहे, मात्र यामध्ये कामामध्ये वापरण्यात येणारी रेती ही निकृष्ट दर्जाची व ७५ टक्के माती मिश्रीत असल्याने साखरे पुलाचे भवितव्य धोक्यात आले आहे.पत्रकारांनी रविवारी भेट दिली असतां मजूरांवर सारे काम सोपविलेले होते. दर्जा नियंत्रणासाठी जबाबदार अशी एकही व्यक्ती नव्हती. मजुरांना विचारले असता दुसरी रेती मिळत नसल्याने सुरुवातीपासुन हीच रेती वापरली जात असल्याचे त्यांनी सांगीतले़ हा पुल खुप जुना इंग्रज काळातील बांधलेला असल्याने तो सध्या जिर्ण अवस्थेत व त्याचे पिलर खचु लागलेले आहेत़ तर पुलास कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात न आल्याने त्यास मोठा तडा गेलेला असल्याने हा पूल शेवटच्या घटका मोजतो आहे़ १५-२० वर्षापासुन या पुलाची मागणी होत असल्याने या पुलास अर्थ संकलपामध्ये २ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे़ दिड वर्षामध्ये हा पूल पूर्ण होणार आहे़ त्याची उंची ३ ते ४ मीटर असल्याने भविष्यांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही़ अशी माहीती तत्कालिन अभियंता पालवे यांनी त्यावेळेस दिली होती़ देहेर्जे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या धरणातील पाणीसाठयामध्ये या पुलाचे पिलर राहाणार असल्याने त्यांचे काम हे सुरुवातीपासूनच मजबूत होणे आवश्यक आहे़ (वार्ताहर)