शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

बीएआरसीच्या कंत्राटी कामगारांचा संप मागे

By admin | Updated: September 7, 2015 22:42 IST

तारापूर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात (बीएआरसी) लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (एल अ‍ॅण्ड टी) च्या अधिपत्याखाली असलेल्या व काढलेल्या सत्तरपैकी वीस कामगारांना पुन्हा कामावर घेतल्याने २४ आॅगस्टपासून

बोईसर : तारापूर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात (बीएआरसी) लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (एल अ‍ॅण्ड टी) च्या अधिपत्याखाली असलेल्या व काढलेल्या सत्तरपैकी वीस कामगारांना पुन्हा कामावर घेतल्याने २४ आॅगस्टपासून सुरू झालेले बेमुदत कामबंद आंदोलन सोमवारपासून मागे घेण्यात आले आहे.बी.ए.आर.सी.च्या प्रकल्पामधील ए.एस.एफ.एस.एफ. या प्लान्ट उभारणीचे काम एल अ‍ॅण्ड टी करीत असून त्या कामाकरिता या प्रकल्पालगतच असलेल्या घिवली गावातील सत्तर कामगारांना कंत्राटी स्वरूपात घेण्यात आले होते. त्यापैकी वीस कामगारांचा पगार बंद केल्याने शिवसेनेसह ग्रामपंचायत व ग्रामस्थांबरोबर गावातील काम करणाऱ्या इतर पन्नास कामगारांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते. संपात सहभागी न झालेल्या सुमारे पाचशे परप्रांतीय कामगारांना संपाच्या दुसऱ्याच दिवशी (दि. २५ आॅगस्ट) पोलीस बंदोबस्तात प्लान्टमध्ये नेण्याचा प्रयत्नही ग्रामस्थांनी हाणून पाडला होता.आंदोलनादरम्यान पोलीस व जिल्हा प्रशासनाबरोबर अनेक बैठका झाल्या. अखेर, शनिवारी (५ सप्टेंबर) रोजी प्रांत शिवाजी दावभट यांच्या दालनात सेना नेते व एल अ‍ॅण्ड टी चे अधिकारी यांच्याबरोबर संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत काढलेल्या कामगारांना पुन्हा सामावून घेऊन त्यांना चारपैकी दोन महिन्यांचा पगारही देण्याचे एल अ‍ॅण्ड टी च्या व्यवस्थापनाने मान्य केल्याने बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलक कामगारांच्या पाठीशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, तालुकाप्रमुख सुधीर तामोरे, माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ व उदय पाटील, सेनेचे पदाधिकारी शैलेश मोरे, देवानंद मेहेर, राजेश कुटे, भुवनेश्वर पागधरे, संतोष मोरे, सरपंच भुवनेश्वर हिलीम, उपसरपंच सुनील प्रभू, उपसभापती मनोज संखे यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक होते. पोळा,गौरी,गणपती, ईदच्या आधी हेआंदोलन शांततामय रितीने संपविल्याबद्दल पोलीस, प्रशासन व जनतेत समाधान व्यक्त होते आहे. (वार्ताहर)