शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

बळीराजाची दिवाळी जाणार अंधारातच, पावसाने केली भातपिकांची नासाडी : शेतक-यांना तातडीच्या मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:05 IST

परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील

पारोळ : परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील भातांचे नुकसान झाले. त्यामुळे या वर्षीची दिवाळी अंधारात जाणार आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकाऊन घेतल्याने वसईतील शेतकºयांना मदती ची गरज असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती वसई चे प्रकाश पाटील यांनी लोकमत ला सांगीतले.या पावसाने आडणे, भाताणे, कोपर खानिवडे, शिरवली, सायावन, पारोळ, उसगाव, मेढे वडघर, माजिवली, देपिवली इ. गावात मोठे नुकसान केले. शेतात पाणी साचल्याने भाताची करपे पाण्यावर तरंगतांना दिसत आहेत.सरकारने पालघर जिल्ह्यातील भातशेती नुकसानीचे पंचनामे करावेत-निलेश सांबरेविक्रमगड : पालघर जिल्हयात गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसाने कापणी केलेल्या भातशेतीचे पुरते वाटोळे केले असून या या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी केली असून आपण याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमी प्रमाणात पीक घेण्यात येणारी हलवार शेतीची कापणी आटोपून, शेतकरी गरवा या प्रकारातील मुख्य भात शेतीचे हाताशी आलेले भरघोस पीक घरात आणण्याच्या वेळीच पावसाने या शेतीची उडविलेली धूळधाण पाहता पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. जे काही थोडेफार पीक उरले आहे त्यावर विविध रोग आणि कीड यांचा प्रादुर्भाव झाला आहे.त्याच बरोबर सध्या न झालेल्या भात पिकावर तुडतुड्या व खोडकीडा पडण्याची लक्षणे दिसत असल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे. हा रोग झाल्यास भात पीक हाती लागतंच नाही असा शेतकºयांचा अनुभव आहे.विक्रमगड तालुक्यात या पावसामध्ये वीज पडून दोनजणांना आपला प्राण गमवावा लागला तर ३५ ते ४० घरांचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले आहे अनेकांच्या शेतातील भाताचे तयार पीक आडवे पडले आह.या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना पुन्हा ऐकदा मारले त्यामुळे येथील शेतकºयांपुढे दिवाळी कशी साजरी करावी? हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे या परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त केलेल्या शेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने त्वरीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरपाईचे वाटप तातडीने करावे. तसेच भातावर पडणाº्या रोगावर औषध उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश कृषी खात्याला द्यावेत अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. तर दिवाळीसाठी खावटी दयावी अशीही मागणी आहे

टॅग्स :diwaliदिवाळीFarmerशेतकरी