शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाची दिवाळी जाणार अंधारातच, पावसाने केली भातपिकांची नासाडी : शेतक-यांना तातडीच्या मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:05 IST

परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील

पारोळ : परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील भातांचे नुकसान झाले. त्यामुळे या वर्षीची दिवाळी अंधारात जाणार आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकाऊन घेतल्याने वसईतील शेतकºयांना मदती ची गरज असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती वसई चे प्रकाश पाटील यांनी लोकमत ला सांगीतले.या पावसाने आडणे, भाताणे, कोपर खानिवडे, शिरवली, सायावन, पारोळ, उसगाव, मेढे वडघर, माजिवली, देपिवली इ. गावात मोठे नुकसान केले. शेतात पाणी साचल्याने भाताची करपे पाण्यावर तरंगतांना दिसत आहेत.सरकारने पालघर जिल्ह्यातील भातशेती नुकसानीचे पंचनामे करावेत-निलेश सांबरेविक्रमगड : पालघर जिल्हयात गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसाने कापणी केलेल्या भातशेतीचे पुरते वाटोळे केले असून या या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी केली असून आपण याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमी प्रमाणात पीक घेण्यात येणारी हलवार शेतीची कापणी आटोपून, शेतकरी गरवा या प्रकारातील मुख्य भात शेतीचे हाताशी आलेले भरघोस पीक घरात आणण्याच्या वेळीच पावसाने या शेतीची उडविलेली धूळधाण पाहता पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. जे काही थोडेफार पीक उरले आहे त्यावर विविध रोग आणि कीड यांचा प्रादुर्भाव झाला आहे.त्याच बरोबर सध्या न झालेल्या भात पिकावर तुडतुड्या व खोडकीडा पडण्याची लक्षणे दिसत असल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे. हा रोग झाल्यास भात पीक हाती लागतंच नाही असा शेतकºयांचा अनुभव आहे.विक्रमगड तालुक्यात या पावसामध्ये वीज पडून दोनजणांना आपला प्राण गमवावा लागला तर ३५ ते ४० घरांचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले आहे अनेकांच्या शेतातील भाताचे तयार पीक आडवे पडले आह.या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना पुन्हा ऐकदा मारले त्यामुळे येथील शेतकºयांपुढे दिवाळी कशी साजरी करावी? हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे या परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त केलेल्या शेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने त्वरीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरपाईचे वाटप तातडीने करावे. तसेच भातावर पडणाº्या रोगावर औषध उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश कृषी खात्याला द्यावेत अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. तर दिवाळीसाठी खावटी दयावी अशीही मागणी आहे

टॅग्स :diwaliदिवाळीFarmerशेतकरी