शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बळीराजाची दिवाळी जाणार अंधारातच, पावसाने केली भातपिकांची नासाडी : शेतक-यांना तातडीच्या मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:05 IST

परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील

पारोळ : परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील भातांचे नुकसान झाले. त्यामुळे या वर्षीची दिवाळी अंधारात जाणार आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकाऊन घेतल्याने वसईतील शेतकºयांना मदती ची गरज असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती वसई चे प्रकाश पाटील यांनी लोकमत ला सांगीतले.या पावसाने आडणे, भाताणे, कोपर खानिवडे, शिरवली, सायावन, पारोळ, उसगाव, मेढे वडघर, माजिवली, देपिवली इ. गावात मोठे नुकसान केले. शेतात पाणी साचल्याने भाताची करपे पाण्यावर तरंगतांना दिसत आहेत.सरकारने पालघर जिल्ह्यातील भातशेती नुकसानीचे पंचनामे करावेत-निलेश सांबरेविक्रमगड : पालघर जिल्हयात गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पावसाने कापणी केलेल्या भातशेतीचे पुरते वाटोळे केले असून या या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी केली असून आपण याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमी प्रमाणात पीक घेण्यात येणारी हलवार शेतीची कापणी आटोपून, शेतकरी गरवा या प्रकारातील मुख्य भात शेतीचे हाताशी आलेले भरघोस पीक घरात आणण्याच्या वेळीच पावसाने या शेतीची उडविलेली धूळधाण पाहता पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. जे काही थोडेफार पीक उरले आहे त्यावर विविध रोग आणि कीड यांचा प्रादुर्भाव झाला आहे.त्याच बरोबर सध्या न झालेल्या भात पिकावर तुडतुड्या व खोडकीडा पडण्याची लक्षणे दिसत असल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे. हा रोग झाल्यास भात पीक हाती लागतंच नाही असा शेतकºयांचा अनुभव आहे.विक्रमगड तालुक्यात या पावसामध्ये वीज पडून दोनजणांना आपला प्राण गमवावा लागला तर ३५ ते ४० घरांचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले आहे अनेकांच्या शेतातील भाताचे तयार पीक आडवे पडले आह.या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना पुन्हा ऐकदा मारले त्यामुळे येथील शेतकºयांपुढे दिवाळी कशी साजरी करावी? हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे या परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त केलेल्या शेतकºयांना आधार देण्यासाठी शासनाने त्वरीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून भरपाईचे वाटप तातडीने करावे. तसेच भातावर पडणाº्या रोगावर औषध उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश कृषी खात्याला द्यावेत अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. तर दिवाळीसाठी खावटी दयावी अशीही मागणी आहे

टॅग्स :diwaliदिवाळीFarmerशेतकरी