शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

बहुजन विकास आघाडीचा 'महाविकास' आघाडीला पाठिंबा, 'सिल्व्हर ओक'वर भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 21:11 IST

त्यानंतर लागलीच आमदार ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याची "सिल्वर ओक"

आशिष राणे

वसई - आमदारहितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस प्रणित  महाविकासआघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेत विशेष म्हणजे बविआचे तिन्ही आमदार महाविकास आघाडी सोबत उस्फुर्त पणे सत्तेत सहभागी होतील,अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी लोकमत ला दिली. आज बुधवारी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनात बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांनी आपली हजेरी लावली आणि विधिपूर्वक शपथ ग्रहण केली,यावेळी वसई विधानसभेचे आम. हितेंद्र ठाकूर तसेच त्यांचे नालासोपाऱ्याचे आम.क्षितीज ठाकूर आणि बोईसर चे आम. राजेश पाटील या तिघांनी शपथ घेतली. त्यानंतर बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष आम. हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या तिन्ही आमदारांचा नव्या महाआघाडीच्या सरकारला पाठिंबा देत असल्याचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आम. अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केल्यावर आम.चव्हाण यांनी तसं ट्विटर वरून जाहीरही केलं.

त्यानंतर लागलीच आमदार ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याची "सिल्वर ओक" या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि तिथे ही माझ्या बहुजन विकास आघाडी पक्षाचा पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला असल्याचे लेखी पत्र ही स्वाधीन करीत पवार यांच्याशी चर्चा केली,त्यावेळी पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल तसेच खासदार सुप्रिया सुळे या ही उपस्थित होत्या, दरम्यान बहुजन विकास आघाडी पक्ष या नव्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उस्फुर्त पणे सहभागी झाल्याची माहिती ही लागलीचआम. हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित माध्यमांना ही दिली. विशेष म्हणजे,या अगोदर महिना भर सुरू असलेला सत्तेच्या राजकीय खलबतावर  बारीक लक्ष देत नेमकं काय चाललंय यावर आम. हितेंद्र ठाकूर यांचे बारीक लक्ष होते, मात्र अपक्ष तथा छोटे पक्ष किंबहुना आम ठाकूर हे नेहमीच राज्यात ज्याची सत्ता त्याला पाठिंबा देत आले आहेत,त्यामुळे मधल्या काळात राज्यात भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपद आणि समान वाटा या मुद्द्यांवरून संघर्ष सुरू असताना बहुजन विकास आघाडीने महाआघाडी म्हणजे काँग्रेसचा हात सोडून भाजपला साथ दिली होती. व भाजपची जरी सत्ता आली असती तरी त्यांनी भाजप सरकारलाच  पाठिंबा दर्शवला असता,मात्र आता नव्या महाविकास आघाडी ला बहुजन विकास आघाडी ने पाठिंबा दिला आहे त्यात तसं काही नवल नाही.

बिनशर्त पाठिंबा म्हणजेच तिन्ही मतदारसंघात विकासाला प्राधान्य द्यावे

....आमदार, हितेंद्र ठाकुरांची हीच मनीषा

आमदार ठाकूर यांनी मागील तीन दशकं जरी वसई व पालघर जिल्ह्यात सत्ता उपभोगली असली तरी मात्र राज्यात सरकार कुठलेही येऊ दे ।। माझा पाठिंबा म्हणजे त्याच्या बदल्यात मला माझ्या मतदारसंघात विकासासाठी प्राधान्य दयावे हीच मनीषा ठेवत आजवर आम. ठाकुर यांनी समाजकारण केलं आहे,आणि म्हणूनच इथं बविआ ची एकहाती सत्ता आजवर  आरूढ होऊन वसईचा विकास व कायापालट झाला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाVasai Virarवसई विरारMLAआमदारHitendra Thakurहितेंद्र ठाकूर