शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

बिघडलेल्या तरुणांच्या डोळ्यांत घातले अंजन

By admin | Updated: January 5, 2016 00:55 IST

आताच्या तरुणींना ‘व्हॅलेंटाइन डे’ची तारीख पाठ असते. या दिवशी कुणाला गुलाबाचे फुल द्यावे आणि कुणाला देऊ नये, हे चांगलेच कळते.

वाडा : आताच्या तरुणींना ‘व्हॅलेंटाइन डे’ची तारीख पाठ असते. या दिवशी कुणाला गुलाबाचे फुल द्यावे आणि कुणाला देऊ नये, हे चांगलेच कळते. मात्र, सावित्रीबाई फुलेंची जन्मतारीख कुणाच्या लक्षात राहत नाही. मुलींसाठी ज्ञानाची कवाडे उघडी करणाऱ्या व ज्या मातेमुळे आपण भरारी घेतली, तिचा जन्म दिवस आताच्या तरुणींना माहीत नसणे, हे दु:खदायक असल्याचे सांगून सहायक पोलीस निरीक्षक चित्रा मढवी यांनी आजच्या पिढीच्या डोळ्यांत जळजळीत अंजन भरले. त्या घोणसई येथे बोलत होत्या.वाडा तालुक्यातील घोणसई येथे एक आवाज सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन रविवारी (दि. ३) केले होते. त्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोणसईच्या सरपंच अश्विनी घोरकणे या होत्या. तर, प्रमुख पाहुण्या म्हणून पंचायत समिती सदस्या मेघना पाटील होत्या. चित्रा मढवी पुढे म्हणाल्या की, समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रूढी व परंपरा बंद करा आणि त्या बंद केल्यानेच सावित्रीबाई फुलेंना खरी आदरांजली ठरू शकेल. त्या पुढे म्हणाल्या, आई ही मुलीची खरी मैत्रीण असली पाहिजे. मात्र, हल्ली आईपेक्षा मैत्रीण तिला जवळची वाटते. कारण, ‘सेटिंग’ लावण्याचे काम ती करत असते, अशी टीका करून मैत्रिणींमुळे अनेक प्रश्न उद्भवतात, त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. या वेळी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वैशाली पाटील (आरोग्य), चित्रा मढवी (पोलीस), रश्मी पाटील (पत्रकार), श्रीमती शकिला (गृहिणी), ऐश्वर्या पाटील (कुस्तीपटू), वैष्णवी पाडेकर (गायक) या महिलांचा ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला. (वार्ताहर)