शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आमलेवासीयांना भोगाव्या लागत आहेत मरणयातना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:38 IST

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे गारगाई नदीवरून आमले गावाला जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे.

मोखाडा : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे गारगाई नदीवरून आमले गावाला जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून या गावातील ग्रामस्थांना गावाबाहेर पडण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.गावात एका ठिकाणी पूल आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी वन विभागाच्या विरोधामुळे पूलाचे खांब उभे करून अर्धवट अवस्थेत काम बाकी आहे. २०१४ पर्यंत पावसाळ्यात ग्रामस्थांना गावाबाहेर जाणे शक्य नव्हते. अगदी खूप आजारी रूग्ण असेल तर ग्रामस्थ डोलीतून ५ ते ६ किलोमीटरचे अंतर डोंगर चढून दवाखान्यापर्यंत घेऊन जायचे. या अर्धवट खांबाचा वापर करून ग्रामस्थ व आरोहन संस्थेच्या पुढाकाराने २०१४-१५ मध्ये साकव बांधण्यात आला होता. या साकवमुळे पावसाळ्यातही ग्रामस्थांना ये-जा करता येत होती.मात्र अतिवृष्टीमुळे येथील भातशेती, भाजीपाला, मोगºयाची शेती वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले. आमले येथील ४० कुटुंंब गेल्या ३ ते ४ वर्षापासून मोगरा शेतीमधून उत्पादन घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. सप्टेंबरपासून ते जून अखेरपर्यंत ५० ते ६० हजार रुपये मोगºयातून उत्पादन घेतात. अतिवृष्टीमुळे लोखंडी पूल वाहून गेल्यानंतर तातडीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन हा पूल पुन्हा उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले मात्र, ते हवेतच विरले आहे.>जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आमले गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ३ ते ४ वर्षांपूर्वी आरोहण संस्थेच्या माध्यमातून ४२ शेतकºयांनी मोगºयाची लागवड केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.-गणेश सरोदे, कार्यकर्ते, आरोहण>गावातील वृद्ध महिला, रु ग्ण विद्यार्थी यांचा या नदीतील जीवघेणा प्रवास बघून या गावातील तरुणांनी लाकूड आणि पाण्याच्या टाक्या यापासून एक तरफा तयार केला आहे. याच तरफ्यावरून ग्रामस्थांची सध्या ये-जा सुरू आहे. लोखंडी पूल वाहून गेल्याने येथील तरुणांवर बेरोजगारी ओढवली आहे. गावात मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड होत असून तयार झालेले उत्पादन गावाबाहेर न्यायचा कसा हा प्रश्न येथील तरु ण शेतकºयांसमोर आहे.- पांडुरंग वारे, स्थानिक>पुरामध्ये लोखंडी पूल वाहून गेल्याने आमचा इतर गाव, तालुक्याशी संपर्क तुटला आहे. रूग्णांना जंगलातून डोली करून घेऊन जावे लागते.-सोमनाथ किरकिरे,पोलीस पाटील