शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

घोडांच्या मातोश्रीवारीची वनगांची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 23:49 IST

सोमवारी दुपारी आ. रवींद्र फाटक यांनी आपल्या समर्थकांसह अमित घोडा यांना सोबत घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले.

- हितेन नाईकपालघर : जिल्ह्यात शिंदेशाही आणण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमच्या व्यूहरचनेला सुरुवात झाली आहे. श्रीनिवास वनगा यांच्या विजयाला धोका पोचण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यांनी सरळ महाआघाडीचे उमेदवार अमित घोडा यांना मातोश्रीची वारी करवली. उमेदवारी अर्जात काही त्रुटी राहिल्याने तुझा अर्ज बाद होणार असल्याचे सांगून निवडणुकीतून माघार घ्यायला लावल्याचे सांगितले जाते. प्रचंड दहशतीच्या वातावरणाखाली त्यांच्यावर हल्ला होणार असल्यानेच दबावाखाली येत अमित घोडा यांनी माघार घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.सोमवारी दुपारी आ. रवींद्र फाटक यांनी आपल्या समर्थकांसह अमित घोडा यांना सोबत घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. तेथे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण केली. पालघरमध्ये महाआघाडीतर्फे मला राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी दिली होती. असे असतानाही काँग्रेसचे उमेदवार योगेश नम यांनी उमेदवारी अर्ज भरला. कालपर्यंत काँग्रेस उमेदवाराने आपला अर्ज मागे घेण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे आपण अर्ज मागे घेतल्याचे पत्रकारांना सांगितले.दरम्यान, घोडा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना स्वत: आणि पत्नीचे गेल्या ५ वर्षांचे ३१ मार्चपर्यंतचे आयकर विवरण (इन्कम टॅक्स) पत्र सादर करताना ३ वर्षांचे विवरण पत्र सादर केले. तर शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला असतानाही गेल्या १० वर्षांत ताबा घेतल्याच्या माहितीत ‘नाही’ असे उत्तर लिहिले आहे.यावर सेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी लेखी आक्षेप नोंदविल्याने तुझा उमेदवारी अर्ज फेटाळून लावला जाईल, कोर्टात खेचू अशी भीती दाखिवण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. यावर अमित घोडा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यावेळी महाआघाडीने मोठे शक्ती प्रदर्शन केल्याने सेनेला धडकी भरली होती. त्यामुळे सेनेकडून अमित घोडा यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात, प्रचारादरम्यान त्यांच्यावर अथवा त्यांच्या घरावर हल्ला होणार असल्याचे संकेत होते. या धमक्यांना घाबरून दहशतीच्या वतावरणाखाली घोडा यांनी नाईलाजाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड यांनी केला आहे.सेना महायुती पुढे महाआघाडीने उभ्या केलेल्या आव्हानामुळे सेनेच्या गटात काही अंशी चलबिचल सुरू होती.

ठाकरे यांच्या भेटीनंतर निर्णय बदलला?- अमित घोडा यांनी डहाणू भागात आदिवासी गाव-पाड्यात बनविलेल्या संघटनांची ताकद, सेनेतील नाराजांची मिळणारी कुमक, जोडीला काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, माकप, जनता दल, आदींची साथ, त्यातच काही काळासाठी आपल्या पक्षापासून लांब राहिलेले आ. आनंद ठाकूर हेही पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय झाले.- अमित घोडा सेनेसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे पाहिल्यावर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीम सक्रीय झाल्या. रविवारी सकाळी अमित घोडा यांनी आ. ठाकूर यांची भेट घेत काँग्रेसच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी चर्चाही केली. त्यानंतर शिंदे यांच्या टीमने अमित यांना गाठत ठाणे आणि तेथून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घडवली, त्यानंतर हा निर्णय झाल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाpalghar-acपालघर