शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

अंबाडी रोड रेल्वे पुलाला मुहूर्त; दोन महिन्यांपासून होता बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:58 PM

सा.बां.कडून २ कोटींचा निधी येईपर्यंत रेल्वेकडून डागडुजी

नालासोपारा : वसईतील दोन महिन्यांपासून दुरूस्तीसाठी बंद असलेला जुन्या अंबाडी पुलाच्या दुरूस्तीसाठी रेल्वेने आता सुरवात केली असून पुलावरील भार काढण्यास शुक्र वार पासून सुरवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या जलवाहिन्या, महावितणाच्या व खाजगी मोबाईल कंपन्यांच्या केबल्स काढून टाकण्यास सुरवात झाली. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्तीचा निधी येई पर्यंत दुरस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले.

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने सर्व धोकादायक पुल बंद केले होते. या पुलांची पाहणी करून ते दुरूस्त केले जाणार होते. वसईच्या अंबाडी रोडवरील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जूना पूल बंद करण्यात आला होता. तो बंद झाल्यानंतर वाहतूक नव्या पूलावरून वळविण्यात येत आहे. मात्र दोन महिने उलटूनही जुन्या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती न घेतल्याने नागरिकाकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. केवळ एकाच पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीही होत होती. पुलाचे स्ट्रक्टरल आॅडीट न करता धोकादायक कसा काय असा सवाल महापालिकेने करून तो खुला करण्याची मागणी केली होती.

हा जुना पुल सुरू करण्यासंदर्भात वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी सर्व शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे, महावितरण, खाजगी मोबाईल कंपन्या आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. पुलाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी त्यावरील भार हलका करण्याचा निर्णयÞ घेण्यात आला.

वसईतील जूना अंबाडी पूल रेल्वेने दुरूस्तीसाठी बंद केला आहे. मात्र आता या पुलावर आता बेकादेशीर वाहनतळ सुरू झालेला आहे. पुलाचे काम सुरू होत नाही आणि त्याता आता बेकायदेशीर वाहनतळ सुरू झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वसईतील पूर्व व पश्चिमेला जोडणारा जुना अंबाडी पूल धोकादायक असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याच्या दुरूस्तीचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नव्हते. मात्र त्या पुलावर आता बेकायदेशीर पणे सरार्स वाहने पार्किंग होऊ लागली आहेत. वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने कोणीही याठिकाणी वाहन उभे करून निघून जाते.

त्यानुसार जुन्या पूलावरून गेलेल्या पालिकेच्या जलवाहिन्या, महावितरणाचे आणि खाजगी मोबाईल कंपन्यांचे केबल्स काढण्याचा निर्णयÞ घेण्यात आला. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. या पुलाच्या दुरूस्तीचा खर्च दोन कोटी रु पये असून पश्चिम रेल्वेने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हा खर्च मागितला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हा निधी येईपर्यंत रेल्वेकडून दुरूस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.

जूना पूल बंद असल्याने वाहतूक नवीन पुलावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पूलावर वाहतूक कोंडी होत असते. तर दुसरीकडे जुना पूल दुरूस्त होत नाही आणि तरी देखील बंद ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पूलाला लागूनच पुर्वेकडे स्मशानभूमी असून त्याच्या बाजूला एक गॅरेजवाला आहे. त्याने आपल्या कडे दुरु स्तीसाठी आलेल्या गाड्या सर्रास पणे या पुलावर जाणाºया मार्गावर चढणीवर पार्क केलेल्या आहेत. तसेच पुलाच्या पश्चिम दिशेलाही पंचवटी हॉटेलजवळही पुलावर अनिधकृत रित्या वाहने पार्क होत आहेत.

यावर बोलताना वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात जुन्या पुलावर बेकायदेशीर रित्या पार्किंग करून लोक निघून जातात ही सत्य परिस्थिती आहे. याबाबत आमची कारवाई सुरूच आहे. आमचे पोलीस कर्मचारी त्याठिकाणी असल्यावर कोणीही पार्किंग करीत नाहीत. तसेच अशा प्रकारचे बेकायदा पार्किंग करणारे जर आढळून आले तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते.

टॅग्स :railwayरेल्वेVasai Virarवसई विरार