शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

अंबाडी रोड रेल्वे पुलाला मुहूर्त; दोन महिन्यांपासून होता बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:58 IST

सा.बां.कडून २ कोटींचा निधी येईपर्यंत रेल्वेकडून डागडुजी

नालासोपारा : वसईतील दोन महिन्यांपासून दुरूस्तीसाठी बंद असलेला जुन्या अंबाडी पुलाच्या दुरूस्तीसाठी रेल्वेने आता सुरवात केली असून पुलावरील भार काढण्यास शुक्र वार पासून सुरवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या जलवाहिन्या, महावितणाच्या व खाजगी मोबाईल कंपन्यांच्या केबल्स काढून टाकण्यास सुरवात झाली. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्तीचा निधी येई पर्यंत दुरस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले.

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने सर्व धोकादायक पुल बंद केले होते. या पुलांची पाहणी करून ते दुरूस्त केले जाणार होते. वसईच्या अंबाडी रोडवरील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जूना पूल बंद करण्यात आला होता. तो बंद झाल्यानंतर वाहतूक नव्या पूलावरून वळविण्यात येत आहे. मात्र दोन महिने उलटूनही जुन्या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती न घेतल्याने नागरिकाकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. केवळ एकाच पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीही होत होती. पुलाचे स्ट्रक्टरल आॅडीट न करता धोकादायक कसा काय असा सवाल महापालिकेने करून तो खुला करण्याची मागणी केली होती.

हा जुना पुल सुरू करण्यासंदर्भात वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी सर्व शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे, महावितरण, खाजगी मोबाईल कंपन्या आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. पुलाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी त्यावरील भार हलका करण्याचा निर्णयÞ घेण्यात आला.

वसईतील जूना अंबाडी पूल रेल्वेने दुरूस्तीसाठी बंद केला आहे. मात्र आता या पुलावर आता बेकादेशीर वाहनतळ सुरू झालेला आहे. पुलाचे काम सुरू होत नाही आणि त्याता आता बेकायदेशीर वाहनतळ सुरू झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वसईतील पूर्व व पश्चिमेला जोडणारा जुना अंबाडी पूल धोकादायक असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याच्या दुरूस्तीचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नव्हते. मात्र त्या पुलावर आता बेकायदेशीर पणे सरार्स वाहने पार्किंग होऊ लागली आहेत. वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने कोणीही याठिकाणी वाहन उभे करून निघून जाते.

त्यानुसार जुन्या पूलावरून गेलेल्या पालिकेच्या जलवाहिन्या, महावितरणाचे आणि खाजगी मोबाईल कंपन्यांचे केबल्स काढण्याचा निर्णयÞ घेण्यात आला. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. या पुलाच्या दुरूस्तीचा खर्च दोन कोटी रु पये असून पश्चिम रेल्वेने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हा खर्च मागितला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हा निधी येईपर्यंत रेल्वेकडून दुरूस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.

जूना पूल बंद असल्याने वाहतूक नवीन पुलावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पूलावर वाहतूक कोंडी होत असते. तर दुसरीकडे जुना पूल दुरूस्त होत नाही आणि तरी देखील बंद ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पूलाला लागूनच पुर्वेकडे स्मशानभूमी असून त्याच्या बाजूला एक गॅरेजवाला आहे. त्याने आपल्या कडे दुरु स्तीसाठी आलेल्या गाड्या सर्रास पणे या पुलावर जाणाºया मार्गावर चढणीवर पार्क केलेल्या आहेत. तसेच पुलाच्या पश्चिम दिशेलाही पंचवटी हॉटेलजवळही पुलावर अनिधकृत रित्या वाहने पार्क होत आहेत.

यावर बोलताना वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात जुन्या पुलावर बेकायदेशीर रित्या पार्किंग करून लोक निघून जातात ही सत्य परिस्थिती आहे. याबाबत आमची कारवाई सुरूच आहे. आमचे पोलीस कर्मचारी त्याठिकाणी असल्यावर कोणीही पार्किंग करीत नाहीत. तसेच अशा प्रकारचे बेकायदा पार्किंग करणारे जर आढळून आले तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते.

टॅग्स :railwayरेल्वेVasai Virarवसई विरार