शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पालघरमध्ये ६६ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 03:01 IST

जिल्ह्यातील १८ हजार ६४७ जणांना महात्मा फुले योजनेचा मिळाला लाभ 

हितेन नाईकपालघर : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे यंदा अनेक जिल्ह्यांत रेकॉर्डब्रेक पीककर्ज वाटप झाले आहे. पालघर जिल्ह्यातही खरीप हंगामासाठी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक १२ हजार ५७०, राष्ट्रीयीकृत बँक ६ हजार ७३० तर ग्रामीण बँकेला ७००चा लक्षांक देण्यात आला होता, यापैकी ६६ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये २०-२१च्या खरीप हंगामासाठी जिसम बँकेला १० हजार ७०० शेतकऱ्यांना, तर रब्बी हंगामासाठी १ हजार ८७० शेतकऱ्यांना अशा एकूण १२ हजार ५७० शेतकऱ्यांना कर्जवाटपाचा लक्षांक देण्यात आला होता. यापैकी ७ हजार ६२२ तर रब्बी हंगामासाठी १ हजार ५५४ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकेला खरीप हंगामासाठी ५ हजार ७२५, तर रब्बी हंगामासाठी १ हजार ५ अशा एकूण २ हजार ३६३ शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी खरीप हंगामासाठी २ हजार ३६३ शेतकऱ्यांना कर्जवाटप केले गेले आहे. तर ग्रामीण बँकेला खरीप हंगामासाठी ६००, तर रब्बी हंगामासाठी १०० अशा एकूण ७०० शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ६० जणांना कर्जवाटप झाले आहे. 

दरम्यान, राष्ट्रीय बँक आणि ग्रामीण बँकेकडून रब्बी हंगामासाठी कर्जवाटप झालेले नाही. महात्मा फुले योजनेतील सर्व शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर वेळेत अपलोड करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून दिला आहे. याबाबत कुणाचीही तक्रार आलेली नाही, अशी माहिती पालघरचे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी दै. ‘लोकमत’ला दिली.  

महात्मा फुले योजनेतील सर्व शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर वेळेत अपलोड करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून दिला आहे. याबाबत कुणाचीही तक्रार आलेली नाही. - दिगंबर हौसारे, जिल्हा उपनिबंधक 

ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आमच्या भागापर्यंत पोचतच नाहीत. त्यामुळे आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही.- दीपेश पावडे, शेतकरी, आंबरे

आमच्या काटाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे १ कोटी ५५ लाखाचे कर्ज माफ झाल्यामुळे संस्थेला ४१ लाख ६९ हजाराचा नफा झाला आहे. - महेंद्र अधिकारी, चेअरमन, काटाळे सहकारी संस्था.

टॅग्स :Farmerशेतकरी