शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

पालघरमध्ये ६६ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 03:01 IST

जिल्ह्यातील १८ हजार ६४७ जणांना महात्मा फुले योजनेचा मिळाला लाभ 

हितेन नाईकपालघर : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे यंदा अनेक जिल्ह्यांत रेकॉर्डब्रेक पीककर्ज वाटप झाले आहे. पालघर जिल्ह्यातही खरीप हंगामासाठी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक १२ हजार ५७०, राष्ट्रीयीकृत बँक ६ हजार ७३० तर ग्रामीण बँकेला ७००चा लक्षांक देण्यात आला होता, यापैकी ६६ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये २०-२१च्या खरीप हंगामासाठी जिसम बँकेला १० हजार ७०० शेतकऱ्यांना, तर रब्बी हंगामासाठी १ हजार ८७० शेतकऱ्यांना अशा एकूण १२ हजार ५७० शेतकऱ्यांना कर्जवाटपाचा लक्षांक देण्यात आला होता. यापैकी ७ हजार ६२२ तर रब्बी हंगामासाठी १ हजार ५५४ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकेला खरीप हंगामासाठी ५ हजार ७२५, तर रब्बी हंगामासाठी १ हजार ५ अशा एकूण २ हजार ३६३ शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी खरीप हंगामासाठी २ हजार ३६३ शेतकऱ्यांना कर्जवाटप केले गेले आहे. तर ग्रामीण बँकेला खरीप हंगामासाठी ६००, तर रब्बी हंगामासाठी १०० अशा एकूण ७०० शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ६० जणांना कर्जवाटप झाले आहे. 

दरम्यान, राष्ट्रीय बँक आणि ग्रामीण बँकेकडून रब्बी हंगामासाठी कर्जवाटप झालेले नाही. महात्मा फुले योजनेतील सर्व शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर वेळेत अपलोड करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून दिला आहे. याबाबत कुणाचीही तक्रार आलेली नाही, अशी माहिती पालघरचे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी दै. ‘लोकमत’ला दिली.  

महात्मा फुले योजनेतील सर्व शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर वेळेत अपलोड करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून दिला आहे. याबाबत कुणाचीही तक्रार आलेली नाही. - दिगंबर हौसारे, जिल्हा उपनिबंधक 

ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आमच्या भागापर्यंत पोचतच नाहीत. त्यामुळे आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही.- दीपेश पावडे, शेतकरी, आंबरे

आमच्या काटाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे १ कोटी ५५ लाखाचे कर्ज माफ झाल्यामुळे संस्थेला ४१ लाख ६९ हजाराचा नफा झाला आहे. - महेंद्र अधिकारी, चेअरमन, काटाळे सहकारी संस्था.

टॅग्स :Farmerशेतकरी