शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

वसई-विरार महापालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 01:21 IST

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आशिष राणेवसई : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र तसेच जिम आणि स्विमिंग पूल वगळता मंगळवारपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली करण्यात आली आहेत. अनलॉक-२ व ३ मध्ये सम-विषम तत्त्वावर दुकाने आयुक्तांच्या निर्देशानुसार अजूनपर्यंत सुरू होती. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली असल्याने सोमवारी संध्याकाळी उशिरा वसई-विरार महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी याबाबतचे लेखी आदेश काढल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.राज्य सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यापूर्वी दुकानांसाठी पी-१ व पी-२ असा सम-विषम नियम लागू होता. त्यामुळे शहरात महिनाभरात साधारण १२ दिवस दुकाने खुली राहत होती. त्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून कामगारांचा खर्च, दुकानाचे भाडे देणेही कठीण होते. त्यामुळे दोन्ही बाजूची दुकाने सातही दिवस खुली राहावीत यासाठी राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यावर निर्णय घेत मुंबईसह एमएमआर रिजनमधील आयुक्त यांनी आपापल्या स्तरावर सर्व दुकाने खुली ठेवता येतील का याचा सारासार विचार व आरोग्य सर्वेक्षण करून निर्णय घ्यावयाचा आहे, असे अधिकार प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी यापूर्वीची सम-विषम पद्धत दि. १७ आॅगस्टच्या आदेशानुसार बंद केली. दरम्यान, नव्या आदेशानुसार आता वसई-विरारमधील प्रतिबंध क्षेत्र तथा जिम व स्विमिंग पूल वगळता शहरातील सर्व दुकाने सुरू होत असल्याने आता छोट्या-मोठ्या दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: मद्यविक्रीच्या दुकानांचाही यात समावेश आहे. मद्यविक्रीची दुकानेही संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उघडी राहणार असून गर्दी न होता तोंडाला मास्क, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. शहरातील सर्व दुकानदारांनी कोणत्याही नियमाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा देखील महापालिकेने दिला आहे. आता गणेशोत्सव चार दिवसांवर असताना असे आदेश निघाल्याने वसईकरांना कोरोना संकटात हा एक दिलासा मिळाला आहे.>पालिका क्षेत्रात रुग्ण दर १४ टक्क्यांवर!शहरातील बाधित रूग्णसंख्या, मृत्यू व मुक्त संख्या कमी होण्याकामी विविध उपाययोजना मनपाने राबविल्या आहेत. यामध्ये जास्त रुग्णसंख्या असलेले क्षेत्र मोठे करून त्या भागात लॉकडाऊन करणे, गर्दी होणाºया दुकानावर व भाजी विक्रेत्यांवर कारवाई करणे, दंड आकारणी, शहरात चाचण्यांची संख्या वाढवणे, त्यामुळे सध्या वसई-विरारमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे आणि हा आकडा आता दिवसागणिक १४ टक्क्यांवर आलेला आहे, ही बाब नक्कीच दिलासादायक आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार