शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 01:21 IST

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आशिष राणेवसई : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र तसेच जिम आणि स्विमिंग पूल वगळता मंगळवारपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली करण्यात आली आहेत. अनलॉक-२ व ३ मध्ये सम-विषम तत्त्वावर दुकाने आयुक्तांच्या निर्देशानुसार अजूनपर्यंत सुरू होती. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली असल्याने सोमवारी संध्याकाळी उशिरा वसई-विरार महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी याबाबतचे लेखी आदेश काढल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.राज्य सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यापूर्वी दुकानांसाठी पी-१ व पी-२ असा सम-विषम नियम लागू होता. त्यामुळे शहरात महिनाभरात साधारण १२ दिवस दुकाने खुली राहत होती. त्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून कामगारांचा खर्च, दुकानाचे भाडे देणेही कठीण होते. त्यामुळे दोन्ही बाजूची दुकाने सातही दिवस खुली राहावीत यासाठी राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यावर निर्णय घेत मुंबईसह एमएमआर रिजनमधील आयुक्त यांनी आपापल्या स्तरावर सर्व दुकाने खुली ठेवता येतील का याचा सारासार विचार व आरोग्य सर्वेक्षण करून निर्णय घ्यावयाचा आहे, असे अधिकार प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी यापूर्वीची सम-विषम पद्धत दि. १७ आॅगस्टच्या आदेशानुसार बंद केली. दरम्यान, नव्या आदेशानुसार आता वसई-विरारमधील प्रतिबंध क्षेत्र तथा जिम व स्विमिंग पूल वगळता शहरातील सर्व दुकाने सुरू होत असल्याने आता छोट्या-मोठ्या दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: मद्यविक्रीच्या दुकानांचाही यात समावेश आहे. मद्यविक्रीची दुकानेही संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उघडी राहणार असून गर्दी न होता तोंडाला मास्क, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. शहरातील सर्व दुकानदारांनी कोणत्याही नियमाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा देखील महापालिकेने दिला आहे. आता गणेशोत्सव चार दिवसांवर असताना असे आदेश निघाल्याने वसईकरांना कोरोना संकटात हा एक दिलासा मिळाला आहे.>पालिका क्षेत्रात रुग्ण दर १४ टक्क्यांवर!शहरातील बाधित रूग्णसंख्या, मृत्यू व मुक्त संख्या कमी होण्याकामी विविध उपाययोजना मनपाने राबविल्या आहेत. यामध्ये जास्त रुग्णसंख्या असलेले क्षेत्र मोठे करून त्या भागात लॉकडाऊन करणे, गर्दी होणाºया दुकानावर व भाजी विक्रेत्यांवर कारवाई करणे, दंड आकारणी, शहरात चाचण्यांची संख्या वाढवणे, त्यामुळे सध्या वसई-विरारमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे आणि हा आकडा आता दिवसागणिक १४ टक्क्यांवर आलेला आहे, ही बाब नक्कीच दिलासादायक आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार