शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

सर्व पक्षांना बंडखोरीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:42 PM

पालघरचे राजकीय समीकरण बिघडले : निष्ठावंत, बंडखोर अपक्ष लढण्याच्या तयारीत

पालघर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचा सपाटा सुरु झाल्याने २८ नगरसेवकांच्या जागांचे गणित बिघडणार आहे. याचा निष्ठावंत शिवसैनिकात संतप्त असून अनेकांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार अर्ज भरण्याची तयारी चालवली आहे. त्यातच युती झाल्यास जागा वाटपाचे गणितही कोलमडण्याच्या उंबरठ्यावर उभे राहणार असल्याने भाजपकडून २८ उमेदवार तयारीत आहेत.

राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेले गटनेते, नगरसेवक मकरंद पाटील, त्यांच्या पत्नी नगरसेविका डॉ. श्वेता पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका बिंदीया दीक्षित, रेश्मा म्हात्रे, प्रविण मोरे हे पाच नगरसेवक गुरु वारी रात्रौ सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असून शिवसेने कडून नगराध्यक्षाची उमेदवार म्हणून डॉ. श्वेता पाटील यांच्या नावाची घोषणा आणि त्या अन्य नगरसेवकांना सेनेकडून पुन्हा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

या बातमी मुळे स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या मध्ये संतप्त भाव उमटत असून राष्ट्रवादीच्या ५ विद्यमान नगरसेवकासह राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शहर प्रमुख अस्लम मणियार, माजी नगरसेवक रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे, राजू पाटील, अमोल पाटील या पाच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेताना त्यांना नगरसेवक पदाचे तिकीट देण्याच्या अटीवरच घेतले गेले असल्याने निष्ठावान शिवसैनिक आणि उपरे असा वाद निर्माण होणार आहे.विद्यमान नगरपरिषदेत २८ पैकी १७ नगरसेवक शिवसेनेचे असून हे सर्व निष्ठावंत आहेत. त्यांनी पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागितली असून अन्य पक्षातून आयात केलेल्या १० लोकांना कसे सामावून घेणार हा पेच आहे. त्यातच युती झाल्यास भाजप ने निम्म्या जागांवर आपला अधिकारमागितला असल्याने, मित्रपक्ष आरपीआयला एक-दोन जागा सोडणे गरजेचे असल्याने २८ जागांच्या उमेदवारीचे वाटप कसे करणार असा हा प्रश्न आहे.शिवसेनेचे नगरसेवक गुरुवारी मातोश्रीवर गेल्याने दबावतंत्रमकरंद पाटील आणि डॉ. श्वेता पाटील सह अन्य नगरसेवकांना सेनेत घेण्यास स्थानिक शिवसैनिक, पदाधिकाºयाचा प्रचंड मोठा विरोध आहे. मकरंद पाटील आणि त्यांच्यासह अन्य बाहेरच्या पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घ्यायची गरजच काय? असा प्रश्न शिवसैनिका मधून उपस्थित केला जात आहे. माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, अंजली पाटील, उच्च शक्षिति प्राजक्ता वर्दे असे निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार सेने कडे असताना बाहेरच्या पक्षातील लोक पक्षात घेण्याची आवश्यकताच काय? असा प्रश्न घेऊन शिवसेनेचे काही नगरसेवक, पदाधिकारी गुरु वारी मातोश्रीवर गेल्याचे समजते. अश्या परिस्थितीत सेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असून सेनेला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत कलह निर्माण होताना दिसत आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाpalgharपालघर