शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

विरारमध्ये वातानुकुलित स्वच्छतागृह

By admin | Updated: May 1, 2016 02:33 IST

वसई विरार महापालिकेने विरार येथे बांधलेल्या वसई तालुक्यातील पहिल्या वातानुकुुलित वायफाय स्वच्छतागृहाचे १ मेला उद्घाटन होत आहे. यात महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी

- शशी करपे,  विरारवसई विरार महापालिकेने विरार येथे बांधलेल्या वसई तालुक्यातील पहिल्या वातानुकुुलित वायफाय स्वच्छतागृहाचे १ मेला उद्घाटन होत आहे. यात महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये मुतारी, शौचालय, बाथरुमची व्यवस्था असणार आहे. नाममात्र दरात वातानुकुलित सेवा देणारी आणखी २८ स्वच्छतागृहे येत्या वर्षभरात बांधण्यात येणार आहेत.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेने स्वच्छतेचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात वातानुकुलित वायफाय सुविधा असलेली स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यातील पहिले स्वच्छतागृहे बांधून तयार असून १ मेपासून ते लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या स्वच्छतागृहाचा बांधकामाचा संपूर्ण खर्च मंगल शौचालय संस्थेने केला आहे. स्वच्छतागृहासाठी सुमारे पंचवीस लाख रुपये खर्च संस्थेने केला असून त्याबदल्यात संस्था शौचालयासाठी तीन रुपये आणि आंघोळीसाठा पाच रुपये दर आकारून सेवा देणार आहे. विरार रेल्वे स्टेशनलगत असल्याने या स्वच्छतागृहाचा फायदा अनेकांना होणार आहे. पालिकेने अशाच पद्धतीची शहरात आणखी २८ स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वसई विरार शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी वसई विरार महापालिकेने धडक मोहिम हाती घेतली असून १३ हजार ३३८ कुटुंबांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून अनुदान दऊन शौचालये बांधून देणार आहे. तसेच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना रोखण्यासाठी ३८ पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. उघड्यावर बसणाऱ्यांना चापकेंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात वसई विरार पालिकेला ३५ वा क्रमांक मिळाला आहे. मात्र, शहरातील तब्बल १५ हजार कुटुंबे शौचालयाविना आहेत. तर ठिकठिकाणी मिळून सुमारे २ हजार ८०० सार्वजनिक शौचालये असूनही शहर संपूर्णपणे हगणदारीमुक्त झालेले नाही. म्हणूनच शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष ३८ पथके स्थापन केली आहेत. या पथकात पालिका कर्मचारी आणि बचत गटातील सदस्यांचा समावेश आहे. ही पथके उघड्यावर शौचास बसण्याऱ्यांना रोखणार आहे. त्यांच्यात जनजागृती करून जमेल तिथे सार्वजनिक शौचालये बांधली जाणार आहेत. १५ कुटुुंबियांपैकी १३ हजार ३३८ कुुटुंबांकडे स्वत:ची जागा असल्याने त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून अनुदान देऊन शौचालये बांधण्यास मदत करणार आहे. या योजनेतून राज्य सरकार ८ हजार रुपये, ४ हजार रुपये केंद्र सरकार आणि उर्वरित ८हजार रुपये स्वत: पालिका खर्च करणार आहे.