शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

विरारमध्ये वातानुकुलित स्वच्छतागृह

By admin | Updated: May 1, 2016 02:33 IST

वसई विरार महापालिकेने विरार येथे बांधलेल्या वसई तालुक्यातील पहिल्या वातानुकुुलित वायफाय स्वच्छतागृहाचे १ मेला उद्घाटन होत आहे. यात महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी

- शशी करपे,  विरारवसई विरार महापालिकेने विरार येथे बांधलेल्या वसई तालुक्यातील पहिल्या वातानुकुुलित वायफाय स्वच्छतागृहाचे १ मेला उद्घाटन होत आहे. यात महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये मुतारी, शौचालय, बाथरुमची व्यवस्था असणार आहे. नाममात्र दरात वातानुकुलित सेवा देणारी आणखी २८ स्वच्छतागृहे येत्या वर्षभरात बांधण्यात येणार आहेत.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेने स्वच्छतेचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात वातानुकुलित वायफाय सुविधा असलेली स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यातील पहिले स्वच्छतागृहे बांधून तयार असून १ मेपासून ते लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या स्वच्छतागृहाचा बांधकामाचा संपूर्ण खर्च मंगल शौचालय संस्थेने केला आहे. स्वच्छतागृहासाठी सुमारे पंचवीस लाख रुपये खर्च संस्थेने केला असून त्याबदल्यात संस्था शौचालयासाठी तीन रुपये आणि आंघोळीसाठा पाच रुपये दर आकारून सेवा देणार आहे. विरार रेल्वे स्टेशनलगत असल्याने या स्वच्छतागृहाचा फायदा अनेकांना होणार आहे. पालिकेने अशाच पद्धतीची शहरात आणखी २८ स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वसई विरार शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी वसई विरार महापालिकेने धडक मोहिम हाती घेतली असून १३ हजार ३३८ कुटुंबांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून अनुदान दऊन शौचालये बांधून देणार आहे. तसेच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना रोखण्यासाठी ३८ पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. उघड्यावर बसणाऱ्यांना चापकेंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात वसई विरार पालिकेला ३५ वा क्रमांक मिळाला आहे. मात्र, शहरातील तब्बल १५ हजार कुटुंबे शौचालयाविना आहेत. तर ठिकठिकाणी मिळून सुमारे २ हजार ८०० सार्वजनिक शौचालये असूनही शहर संपूर्णपणे हगणदारीमुक्त झालेले नाही. म्हणूनच शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष ३८ पथके स्थापन केली आहेत. या पथकात पालिका कर्मचारी आणि बचत गटातील सदस्यांचा समावेश आहे. ही पथके उघड्यावर शौचास बसण्याऱ्यांना रोखणार आहे. त्यांच्यात जनजागृती करून जमेल तिथे सार्वजनिक शौचालये बांधली जाणार आहेत. १५ कुटुुंबियांपैकी १३ हजार ३३८ कुुटुंबांकडे स्वत:ची जागा असल्याने त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून अनुदान देऊन शौचालये बांधण्यास मदत करणार आहे. या योजनेतून राज्य सरकार ८ हजार रुपये, ४ हजार रुपये केंद्र सरकार आणि उर्वरित ८हजार रुपये स्वत: पालिका खर्च करणार आहे.