शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आई तुझं लेकरू... हंडाभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या माऊलीसाठी लेकानं खोदली विहिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 10:23 IST

डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतेय, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय, असा दावा करतेय

पालघर - आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी दशरथ मांझीने चक्क डोंगरच फोडला होता. दिवंगत पत्नीच्या आठवणीत मांझीने गावातील महिलांना, ग्रामस्थांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने चक्क डोंगर फोडून रस्ता बनवला. त्या माझीवर चित्रपटही बनवण्यात आला आहे. त्याचप्रकारची घटना पालघरच्या आदिवासी पाड्यात घडली आहे. आपल्या आईला पाणी आणण्यासाठी करावा लागणारा संघर्ष पाहाता, आईचे कष्ट सहन न झाल्याने एका शाळकरी मुलाने चक्क घराजवळच विहिर खोदली आहे. प्रणव रमेश सालकर असं या मुलाचं नाव असून तो इय्तात नववीत शिकत आहे. 

डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतेय, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय, असा दावा करतेय. पण, पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा रस्ता मात्र या ‘विकास’ महाशयांना सापडतच नाहीये. कारण गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना  पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतीक्षा आहे. पालघरच्या अनेक पाड्यावरील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी दोन किमीचा डोंगर करावा लागत आहे. 

केळवे गावात धावांगे पाडा हा ६०० ते ७०० लोकवस्तीचा पाडा आहे. खाजण जमिनीचा भाग असल्याने येथील विहीर व बोरिंगला खारट पाणी येते. त्यामुळे या पाड्याला पाण्याची कायमच चणचण भासते. केळवे गावाला महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवले जात असले, तरी नळाला आठवड्यातून रविवार, मंगळवार व गुरुवारी असे तीन दिवसच पाणी येते. येथील दर्शना व रमेश यांचे कुटुंबीय शेतमजुरी करुन जगते. कामावरुन आल्यानंतर दर्शना यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. आईला होणारे हे कष्ट पाहून मुलगा प्रणवने घराजवळील अंगणातच चक्क खोल खड्डा खांदला. १४ वर्षीय प्रणवने स्वतःच्या अंगमेहनतीने घराच्या परिसरात खड्डा खोदत खोदत अखेर विहीरच खोदली, असेच म्हणता येईल. विशेष म्हणजे, १५ फूट खोल खड्डा खोदल्यानंतर येथे पाणीही लागलं आहे. त्यामुळे, प्रणवच्या मेहनतीला फळ मिळालं, मायेच्या प्रेमासाठी त्याने घेतलेले कष्ट सार्थकी लागले.  

टॅग्स :WaterपाणीpalgharपालघरMumbaiमुंबईVasai Virarवसई विरार