शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

२० वर्षांनंतरही वाघ धरण प्रकल्प अपूर्णच; तिवरे धरणफुटीची पुनरावृत्ती होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 23:10 IST

७४ कोटींचा खर्च : प्रचंड गळतीमुळे पाण्याची नासाडी

रवींद्र साळवे मोखाडा : तालुक्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला वाघ प्रकल्प २० वर्षांनंतरही अपूर्णच असून अद्यापपर्यंत हा प्रकल्प व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाघ प्रकल्पाच्या धरणाला प्रचंड गळती लागली असल्याने दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

५१० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणून मोखाडा शहरासह लगतच्या गावपाड्यांना शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वाघ नदीवर सन १९९६ मध्ये या प्रकल्पाचे कामकाज हाती घेण्यात आले. १४ आॅक्टोबर १९८५ रोजी पाटबंधारे विभागाकडून ४ कोटी २५ लाख खर्चाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ९ वर्षानंतर पुन्हा ६ सप्टेंबर १९९४ रोजी ठेकेदाराच्या मूळ मागणीनुसार ९ कोटी ९६ लाख रुपये खर्चाच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यानंतर ३ नोव्हेंबर २००१ रोजी प्रथम सुधारित मान्यतेनुसार २८ कोटी २ लाख रुपये खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिली गेली. यानंतर द्वितीय प्रस्तावित मान्यतेनुसार ७९ कोटी ९० लाखांची तरतूद करून खर्चाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आतापर्यंत या प्रकल्पासाठी तब्बल ७४ कोटी ८२ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे.या धरणाचे बुडीत क्षेत्र १३५ हेक्टर १७ आर ०८ गुंठे असून १०.३० दश लक्ष घनमीटर पाणीसाठा होत आहे. या धरणाचे कामकाज गेल्या १५ वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. यानंतरही २० वर्षांचा कालावधी उलटला असतानाही अद्यापही या धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण झालेले नाही.वाघ प्रकल्पाचे कामकाज पूर्ण झाले आहे. आता नवीन कोणतेच काम केले जाणार नाही. आमच्या विभागाकडून फक्त नवीन काम केले जाते, दुरुस्ती केली जात नाही. ज्या शेतकऱ्यांची जमीन कालव्यात गेली आहे त्यांची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना लवकरच मोबदला मिळेल. -एस. पी. मोरे, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग, वाडावाघ प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नव्हताच. या प्रकल्पाचा काहीच फायदा येथील जनतेला झालेला नाही. वाघ धरणाला व कालव्याला देखील प्रचंड गळती लागली आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने करोडोचा भ्रष्टाचार झालेला आहे. यामुळे आम्ही फौजदारी कारवाई करणार आहोत. -सारिका निकम, सभापती, मोखाडा पंचायत समिती

टॅग्स :Damधरण