शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात बालविवाह नव्हे, प्रौढविवाहाला प्राधान्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 06:27 IST

पालघर हा आदिवासी जिल्हा देशाच्या आर्थिक राजधानी लगत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील एक-दोन तालुक्याचा अपवाद वगळता आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे.

अनिरुद्ध पाटील -बोर्डी :  पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आदिवासींच्या परंपरा, सामुदायिक विवाहांना प्राधान्य तसेच मागील काही वर्षात या समाजात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहाेचल्याने बालविवाहाच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. तर अन्य समाज प्रौढ विवाहालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येते. दरम्यान, कोरोनाच्या काळातही बालविवाहाला थारा मिळाला नसल्याचे चित्र आहे.पालघर हा आदिवासी जिल्हा देशाच्या आर्थिक राजधानी लगत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील एक-दोन तालुक्याचा अपवाद वगळता आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे. समाजधुरीण, समाजसेवक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक, पद्मश्री अनुताई वाघ, कॉम्रेड गोदावरी परुळेकर अशा अनेकांच्या प्रयत्नाने बालके व महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. शिक्षण महर्षींच्या प्रयत्नाने आणि शासनाच्या आदिवासी प्रकल्पाच्या आश्रमशाळा ज्ञानगंगा घरोघरी पोहाेचण्यास मदत झाली आहे. यामुळे बालविवाह खूपच घटले आहेत. 

कोरोनाकाळातही जिल्ह्यात बालविवाहाला थारा नाहीजिल्ह्यात कोरोनाच्या काळातही बालविवाहाला थारा मिळाला नसल्याचे चित्र आहे. शिवाय येथील आदिवासी समाजातील विवाहाच्या प्रथेप्रमाणे लग्नासाठी कडक धोरण नाही. मासिकपाळी नंतर मुलीला सज्ञान समजले जाते. स्वत:च्या मर्जीने मुलगा-मुलगी एकत्र राहून संसार करतात. त्यानंतर योग्य वेळ ठरवून विवाह केला जातो.आर्थिक सक्षमतेनंतर लग्नबंधनात अडकण्याची इच्छाआदिवासी तरुण-तरुणी उच्चशिक्षित होऊन नोकरी मिळाल्यावर आर्थिक सक्षमता आल्यानंतर लग्नबंधनात अडकण्याची मानसिकता वाढत आहे. तर विविध संस्थांनाकडून सामुदायिक विवाहाचे आयोजन केले जाते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने नोंदणीकृत विवाहाचे प्रमाण वाढले आहे.

विवाह नोंदणी बंधनकारक रेशनकार्ड, मुलांचे शैक्षणिक प्रवेश आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विवाह नोंदणी बंधनकारक आहे. या सर्वांमुळे पालघर जिल्ह्यात बालविवाह होताना दिसत नाहीत. 

जिल्ह्यात काही वेळा पाल्यांच्या विवाहाच्या काही दिवस आधी आई-वडील विवाह करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.१,१९९ - सामुदायिक विवाह पार पडले.

पालघर जिल्ह्यात मागील ३५ वर्षांपासून ठाणे जिल्हा श्रमिक झोपडपट्टी सुधार संघातर्फे आदिवासी सेवक कै. अशोक नाना चुरी सामुदायिक विवाह आयोजित करीत. आतापर्यंत १,१९९ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. त्यांचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले आहे. मात्र २१ मार्च रोजी सामुदायिक विवाह आयोजित केला आहे. -संतोष चुरी, पालघर

टॅग्स :marriageलग्नpalgharपालघर