शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

पालघर जिल्ह्यात बालविवाह नव्हे, प्रौढविवाहाला प्राधान्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 06:27 IST

पालघर हा आदिवासी जिल्हा देशाच्या आर्थिक राजधानी लगत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील एक-दोन तालुक्याचा अपवाद वगळता आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे.

अनिरुद्ध पाटील -बोर्डी :  पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आदिवासींच्या परंपरा, सामुदायिक विवाहांना प्राधान्य तसेच मागील काही वर्षात या समाजात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहाेचल्याने बालविवाहाच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. तर अन्य समाज प्रौढ विवाहालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येते. दरम्यान, कोरोनाच्या काळातही बालविवाहाला थारा मिळाला नसल्याचे चित्र आहे.पालघर हा आदिवासी जिल्हा देशाच्या आर्थिक राजधानी लगत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील एक-दोन तालुक्याचा अपवाद वगळता आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे. समाजधुरीण, समाजसेवक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक, पद्मश्री अनुताई वाघ, कॉम्रेड गोदावरी परुळेकर अशा अनेकांच्या प्रयत्नाने बालके व महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. शिक्षण महर्षींच्या प्रयत्नाने आणि शासनाच्या आदिवासी प्रकल्पाच्या आश्रमशाळा ज्ञानगंगा घरोघरी पोहाेचण्यास मदत झाली आहे. यामुळे बालविवाह खूपच घटले आहेत. 

कोरोनाकाळातही जिल्ह्यात बालविवाहाला थारा नाहीजिल्ह्यात कोरोनाच्या काळातही बालविवाहाला थारा मिळाला नसल्याचे चित्र आहे. शिवाय येथील आदिवासी समाजातील विवाहाच्या प्रथेप्रमाणे लग्नासाठी कडक धोरण नाही. मासिकपाळी नंतर मुलीला सज्ञान समजले जाते. स्वत:च्या मर्जीने मुलगा-मुलगी एकत्र राहून संसार करतात. त्यानंतर योग्य वेळ ठरवून विवाह केला जातो.आर्थिक सक्षमतेनंतर लग्नबंधनात अडकण्याची इच्छाआदिवासी तरुण-तरुणी उच्चशिक्षित होऊन नोकरी मिळाल्यावर आर्थिक सक्षमता आल्यानंतर लग्नबंधनात अडकण्याची मानसिकता वाढत आहे. तर विविध संस्थांनाकडून सामुदायिक विवाहाचे आयोजन केले जाते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने नोंदणीकृत विवाहाचे प्रमाण वाढले आहे.

विवाह नोंदणी बंधनकारक रेशनकार्ड, मुलांचे शैक्षणिक प्रवेश आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विवाह नोंदणी बंधनकारक आहे. या सर्वांमुळे पालघर जिल्ह्यात बालविवाह होताना दिसत नाहीत. 

जिल्ह्यात काही वेळा पाल्यांच्या विवाहाच्या काही दिवस आधी आई-वडील विवाह करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.१,१९९ - सामुदायिक विवाह पार पडले.

पालघर जिल्ह्यात मागील ३५ वर्षांपासून ठाणे जिल्हा श्रमिक झोपडपट्टी सुधार संघातर्फे आदिवासी सेवक कै. अशोक नाना चुरी सामुदायिक विवाह आयोजित करीत. आतापर्यंत १,१९९ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. त्यांचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले आहे. मात्र २१ मार्च रोजी सामुदायिक विवाह आयोजित केला आहे. -संतोष चुरी, पालघर

टॅग्स :marriageलग्नpalgharपालघर