शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

जैवविविधता नोंदीबाबत प्रशासनाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:16 IST

उत्तर कोकणातल्या पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी व खाडी परिसरात आणि पश्चिम घाटाच्या कुशीत जैवविविधता ठासून भरली आहे.

हितेंन नाईक/अनिरुद्ध पाटीललोकमत न्यूज नेटवर्कपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील सागरी किनारा, खाडी आणि पश्चिम घाटाच्या रांगांतील परिसंस्था जैवविविधतेने संपन्न असल्याने येथे विविध हंगामात शेकडो देशी-परदेशी पक्षी आणि वन्य प्राण्यांचा वावर आढळतो. ही जैवविविधता भविष्यात टिकून राहावी यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक जैवविविधता नोंदविण्यासाठी वह्या वाटप केल्या आहेत. मात्र त्या नोंदीअभावी कोऱ्या असल्याचे वास्तव राज्य जैवविविधता मंडळाच्या पत्राने समोर आल्याने जैवविविधतेबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून आले आहे.उत्तर कोकणातल्या पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी व खाडी परिसरात आणि पश्चिम घाटाच्या कुशीत जैवविविधता ठासून भरली आहे. वैशिष्ट्यपूर्ण व विपुल प्रमाणात अनेक जातींचे प्राणी, वनस्पती व पक्षी आहेत. मात्र या जिल्ह्यातील लोक जैवविविधता समित्यांनी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडे सादर केलेल्या नोंदवह्यांमध्ये त्याबाबत पुरेशी नोंद केली नसल्याचे समोर आले आहे. टप्पा २ मधील नोंदी करताना या जैवविविधतेची सविस्तर माहिती नोंदवून या मंडळाच्या कार्यालयात सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात विविध हंगामात देशी-परदेशी शेकडो पक्ष्यांचा अधिवास असल्याचे समोर आले आहे. वन विभागानेही त्याची दखल घेतली आहे.गेल्या आठवड्यात यूरोपियन कलहंस दाखल झाले. तसेच चक्रवाक, लेसर व्हिसलिंग, पेंटेड स्टोर्क, ग्लॉसी आयबीस, ब्लॅक हेडेड आयबीस, फ्लेमिंगो आदी पक्ष्यांच्या थव्यांचे दर्शन चिंचणी, तारापूर, केळवे येथे होत असते. मागील अनेक वर्षांपासून या पक्ष्यांनी या भागाला पसंती दिल्याची माहिती स्थानिक पक्षी निरीक्षकांनी दिली. डहाणू उपवन संरक्षक कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना जैवविविधता नोंदवह्या वाटप केल्या आहेत. त्यापैकी चिंचणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नीलेश जाधव यांनी वही मिळालीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिंचणी गावात विविध पक्ष्यांचा वावर असताना, त्याची नोंदच ग्रामपंचायतीने आजपर्यंत केलेली नाही. परंतु ४ जानेवारी २०२० रोजी त्यांना वह्या दिल्याची माहिती बोईसर वनपरिक्षेत्राचे अधिकारी एन. एल. मोरे यांनी दिली. त्यामुळे जैवविविधता टिकून ठेवण्याबाबत प्रशासन पातळीवर उदासीनता दिसून येत आहे.

या विषयाच्या अनुषंगाने माहिती घेतो. शासन पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न केला जाईल.- सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पालघरजैवविविधता नोंदवही अद्याप प्राप्त झाली नसून ग्रामपंचायतीला निधीही वर्ग झालेला नाही.- नीलेश जाधव, ग्रामविकास अधिकारी, चिंचणी ग्रामपंचायत, ता. डहाणू.