शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सनदी अधिकारी असलेल्या पालिका आयुक्तांच्या आदेशाला प्रशासनानेच फासला हरताळ 

By धीरज परब | Updated: December 24, 2023 19:14 IST

११ नोव्हेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश असून देखील समितीने डिसेंबर संपायला आला तरी आपला अहवाल सादर करण्यास टाळाटाळ चालवली आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या किमान वेतन, भत्ते व अन्य सुविधा दिल्या जात नसल्याने त्यासाठी सनदी अधिकारी असलेले महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी ५ बड्या अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. ११ नोव्हेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश असून देखील समितीने डिसेंबर संपायला आला तरी आपला अहवाल सादर करण्यास टाळाटाळ चालवली आहे. त्यामुळे कंत्राटी कामगार वेतन घोटाळ्यात पालिका अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याच्या आरोपांना देखील बळ मिळत आहे. 

महापालिकेने अग्निशमन दल, संगणक चालक, सुरक्षा रक्षक, ट्रॅफिक वॉर्डन, कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, उद्यान अधीक्षक, दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालय व महापालिका इमारती साफसफाई साठी कामगार, वाहन चालक , औषध फवारणी कर्मचारी , उद्यान - मैदान देखभाल, अतिक्रमण व फेरीवाला पथका साठी ठेकेदारामार्फत कंत्राटी कामगार घेतले आहेत. किमान वेतन कायदा, शासनाचे आदेश आदींच्या अनुषंगाने ठेकेदारा मार्फत काम करणाऱ्या कंत्राटी कमर्चाऱ्यांना नियम नुसार किमान वेतन, विमा व वैद्यकीय आदी भत्ते तसेच अन्य सुविधा देणे बंधनकारक आहे. त्याची जबाबदारी केवळ ठेकेदाराचीच नसून महापालिकेची देखील आहे. 

परंतु कंत्राटी कर्मचारी नेमण्यासाठी काही लाख रुपये घेतले जात असल्याचे आरोप होत असतानाच नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर डल्ला मारून त्यांना तुटपुंजा पगार दिला जातो.  कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात डल्ला मान्य मागे काही राजकारणी व अधिकारी यांची चालणारी टक्केवारी कारणीभूत असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. पालिका जर २२-२३ हजार वेतन प्रति कामगार वेट काढत असेल तर कर्मचाऱ्याच्या हाती १२-१६ हजारच पडतात. काहींना तर त्यापेक्षा कमी वेतन दिले जात असल्याच्या तक्रारी व आरोप झाले आहेत. लोकमतने सप्टेंबर महिन्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मारल्या जाणाऱ्या डल्ल्याचे वृत्त दिल्या नंतर ह्या घोटाळ्याची चर्चा ऐरणीवर आली. कर्मचारी संख्येत सुद्धा गडबड केली जात असल्याचा आरोप आहे.  

त्या नंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा म्हणून महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी पर्यवेक्षण समिती स्थापन केली . अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे हे अध्यक्ष तर सहायक आयुक्त कविता बोरकर यांना सदस्य सचिव तसेच उपायुक्त संजय शिंदे , मुख्य लेखापरीक्षक सुधीर नाकाडी व मुख्य लेखा अधिकारी कालिदास जाधव याना सदस्य नेमले. ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ह्या समितीने ११ नोव्हेम्बर पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.  

वेतन अधिनियमांच्या तरतुदींचे पालन व ठेकेदार वेतन दाखला देत असल्याची पडताळणी करा . कर्मचाऱ्यांच्या खात्यावर बँकेत जमा वेतनाच्या रकमेची बँके कडून माहिती घ्या. नियमानुसार वेतन - भत्ते दिल्याचे हमीपत्र ठेकेदारा कडून घ्या.  ठेकेदाराने अटीशर्तींचे पालन केले नसल्यास विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करा . नियमित व बदली ठेका कामगारांची यादी निश्चित  करा . ठेका कमर्चाऱ्यांची उपस्थिती एका क्लिक वर कळेल अशी संगणक प्रणाली तयार करा आदी मुद्द्यांवर  समितीला स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचे आयुक्तांनी सांगितले होते.  

परंतु २५ डिसेंबर उजाडला तरी अजूनही ह्या समितीने आपला अहवाल आयुक्तांना सादर केलेला नाही . कंत्राटी कमर्चाऱ्यांच्या वेतन आदींची देयके काढण्यात व मंजूर करण्यात समितीतील बहुतांश अधिकाऱ्यांचा सहभाग आहे . त्यातच सदर अधिकाऱ्यांनी पूर्वी पासून त्यांच्या कडे आलेल्या ह्या बाबतच्या तक्रारींवर ठोस कारवाई केली नसल्याचे बोलले जातेय . त्यातूनच समितीचा जर प्रामाणिक व सखोल चौकशी अहवाल आल्यास ह्या घोटाळ्यावर प्रशासकीय शिक्कामोर्तब होऊन अनेकांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशा नंतर दिड महिना उलटून गेल्या नंतर सुद्धा समितीने अहवाल सादर केलेला नाही असे आरोप होत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड