शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

‘त्या’ तरुणाचा मित्रांनीच खून केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 00:52 IST

बुडून मृत्यू झाल्याचा बनाव, वडिलांची तक्रार

जव्हार : दिवाळी सुरू असतानाच १५ नोव्हेंबर रोजी रात्री जव्हार तालुक्यातील खर्डीपाडा गावाजवळील लेंडी नदीवर जामदा डोहाजवळ रात्रीची पार्टी करताना नितेश गावितचा गुडघाभर पाण्यात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दारूच्या पार्टीत त्याच्याच मित्रांनीच नितेश गावितचा खून केल्याचा आरोप नितेशचे वडील शिक्षक नानू गावित यांनी केला आहे. मात्र नितेशचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची नोंद जव्हार पोलीस ठाण्यात केली असून जव्हार पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

जव्हार तालुक्यातील सारसून (खर्डीपाडा) गावातील जि. प. शिक्षक नानू गावित यांचा २५ वर्षीय मुलगा नितेश हा १५ नोव्हेंबरच्या दिवशी वडोली येथे सासरवाडीला गेला होता. मात्र त्याच संध्याकाळी रात्री ११ वाजेच्या सुमारास नितेशला त्याच गावातील त्याच्या सहा मित्रांनी लेंडी नदीवर जामदा डोहाजवळ पार्टी करण्यासाठी बोलावले. त्यानंतर त्या मित्रांची पार्टी उशिरापर्यंत चालली, असे नदीजवळील झोपडीत राहणाऱ्या काही लोकांनी सांगितले.पार्टी झाल्यावर नितेश सासरवाडीला निघाला होता असे त्याच्या मित्रांनी सांगितले, मात्र नितेशचा मृत्यू पार्टीच्या अंतरापासून १ कि.मी. दूर नदीच्या डोहात आढळला. दरम्यान, याबाबत मित्र म्हणतात की, आम्ही नशेत होतो आम्हाला माहीत नाही काय झाले ते, तर पार्टीच्या ठिकाणी नितेशचे पैशांचे पॉकेट, बाईकची चावी, चप्पल सापडले आहेत. त्यामुळे नितेश गावितचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला नसून त्याचा खून केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेची कसून चौकशी करावी व आरोपींना अटक करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार