शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

जयसागर धरणात मुबलक पाणीसाठा; जव्हारकरांची पाण्याची चिंता दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:45 IST

गेल्यावर्षी जून महिन्यातच येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जयसागर डॅमही पूर्णपणे कोरडा झाला होता

जव्हार : जव्हार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर डॅममध्ये पाण्याचा मुबलक साठा असून पावसाळा जरी उशीरा सुरू झाला तरी जव्हारकरांना नेहमीप्रमाणे आठवडाभर पाणी पुरवठा करता येणार असल्याची माहिती जव्हार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी दिली.

मार्च महिना उलटला की जिल्ह्यात ठिकठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होऊन टॅँकर आणि इतर स्रोतांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. जव्हारसाठी श्रीमंत राजे यशवंत यांनी बांधलेल्या जयसागर धरणात मुबलक पाणी असल्याने यंदा जव्हारचा प्रश्न सुटला आहे. वर्षभराचे नियोजन आखल्यानेच हे शक्य झाल्याचेही बोरकर यांनी सांगितले.

गेल्यावर्षी जून महिन्यातच येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जयसागर डॅमही पूर्णपणे कोरडा झाला होता. त्यामुळे जवळपास महिनाभर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. काही लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने पाणी पुरवले जात होते. सुदैवाने तशी परिस्थिती यंदा नाही. जयसागर डॅमची उंची वाढविण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू होते. मात्र, अचानक लॉकडाउन झाल्याने काम बंद झाले आहे. उंची जरी वाढली नसली तरी यंदा येथे पुरेसा पाणीसाठा आहे.यंदा पावसाळा जरी उशिराने सुरू झाला तरी शहरात पाणीटंचाई भासणार नाही. धरणात मुबलक पाणीसाठा असून १५ जूनपर्यंत आठवड्यातून पाच दिवस नियमितरीत्या पाणीपुरवठा केला जाणार आहे. - प्रसाद बोरकर, मुख्याधिकारी जव्हार नगर परिषद

टॅग्स :Waterपाणी