शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

जयसागर धरणात मुबलक पाणीसाठा; जव्हारकरांची पाण्याची चिंता दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 02:45 IST

गेल्यावर्षी जून महिन्यातच येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जयसागर डॅमही पूर्णपणे कोरडा झाला होता

जव्हार : जव्हार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर डॅममध्ये पाण्याचा मुबलक साठा असून पावसाळा जरी उशीरा सुरू झाला तरी जव्हारकरांना नेहमीप्रमाणे आठवडाभर पाणी पुरवठा करता येणार असल्याची माहिती जव्हार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी दिली.

मार्च महिना उलटला की जिल्ह्यात ठिकठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होऊन टॅँकर आणि इतर स्रोतांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. जव्हारसाठी श्रीमंत राजे यशवंत यांनी बांधलेल्या जयसागर धरणात मुबलक पाणी असल्याने यंदा जव्हारचा प्रश्न सुटला आहे. वर्षभराचे नियोजन आखल्यानेच हे शक्य झाल्याचेही बोरकर यांनी सांगितले.

गेल्यावर्षी जून महिन्यातच येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जयसागर डॅमही पूर्णपणे कोरडा झाला होता. त्यामुळे जवळपास महिनाभर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. काही लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने पाणी पुरवले जात होते. सुदैवाने तशी परिस्थिती यंदा नाही. जयसागर डॅमची उंची वाढविण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू होते. मात्र, अचानक लॉकडाउन झाल्याने काम बंद झाले आहे. उंची जरी वाढली नसली तरी यंदा येथे पुरेसा पाणीसाठा आहे.यंदा पावसाळा जरी उशिराने सुरू झाला तरी शहरात पाणीटंचाई भासणार नाही. धरणात मुबलक पाणीसाठा असून १५ जूनपर्यंत आठवड्यातून पाच दिवस नियमितरीत्या पाणीपुरवठा केला जाणार आहे. - प्रसाद बोरकर, मुख्याधिकारी जव्हार नगर परिषद

टॅग्स :Waterपाणी