शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीला उडवले; अपघातात तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 10:25 IST

अग्रवाल नाक्याजवळ वसई-विरार मनपाच्या कचरा गाडीने झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: ३७ वर्षीय दुचाकीस्वाराला गुरुवारी दुपारी मनपाच्या कचरा गाडीने उडवले. या अपघातात दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच वालीव पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वालीव पोलिसांनी कचरा गाडीवरील आरोपी चालकाविरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. राजावली परिसरात राहणारे राजेश शंकर मोर (३७) हे गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीने चिंचोटीवरून राजवली येथील घरी येत होते.

अग्रवाल नाक्याजवळ रेंज ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिरुपती इंडस्ट्रीच्या गेटसमोर वसई-विरार मनपाच्या कचरा गाडीवरील चालकाने ताब्यातील वाहन अविचाराने, हयगईने व वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालविल्यामुळे दुचाकीला जोरदार ठोकर मारली. या अपघातात राजेश यांच्या पोटाचा चेंदामेंदा होऊन शरीराचे दोन तुकडे झाले. तसेच, अतिरक्तस्राव झाल्याने घटनास्थळी मृत्यू झाला आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराVasai Virarवसई विरारAccidentअपघात