शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वसईमध्ये ७,२८६ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 01:00 IST

जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती : जीवघेण्या आजारातून बरे झालेल्यांचा सकारात्मक संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : वसई-विरार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र त्याच वेळी शहरातील ७ हजार २८६ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केल्यामुळे सकारात्मक संदेशही मिळाला आहे. जगण्याची इच्छाशक्ती असेल तर कोरोनावर सहज मात करता येते, हेच या बरे झालेल्या रुग्णांनी दाखवून दिले आहे.वसई-विरारमध्ये कोरोना-बाधितांचा वाढता आकडा पाहता स्थिती चिंताजनक आहे. त्यात मागील चार-पाच दिवसांत ३२ जणांचा मृत्यू झाल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. शनिवारी शहरात १८३, तर रविवारी १९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रविवारी रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण रुग्णांची संख्या ११ हजार १९० वर पोहोचली आहे. त्याच वेळी आतापर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २२७ इतकी झाली आहे, तर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या सात हजार २८६ इतकी असून तीन हजार ६७७ रुग्ण उपचार घेत आहेत. यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त असल्याने समाधानही व्यक्त होत आहे.दुसरीकडे वसई-विरार पालिकेला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मागील चार-पाच दिवसांत महापालिका हद्दीत ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सद्यस्थितीत ११ हजारांचा उंबरठा ओलांडून पुढे गेला आहे.महापालिका परिसरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सव्वादोनशेच्या पुढे गेला आहे. यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव चिंताजनक असून महापालिका प्रशासन कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात कमी पडत असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान, महापालिका परिसरात कोरोनाने शिरकाव केला तरी वसई तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रांना त्याची झळ बसली नव्हती, मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाला थोपवून धरण्यात यश मिळवलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रांतही कोरोनाने शिरकाव केला आहे. ग्रामीण भागातील २७ ग्रामपंचायतींच्या हद्दीत आता बाधितांचा आकडा ५०० च्या पुढे गेला आहे. तसेच अद्यापपर्यंत ग्रामीण भागात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.ग्रामीण भागात झपाट्याने संक्रमणपालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. पालघर तालुक्यातील रुग्णांनी एक हजार‘चा तर वसईच्या ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्णांनी ५०० चा टप्पा ओलांडला आहे. रविवारी दुपारपर्यंतच्या अहवालानुसार, पालघर तालुक्यामध्ये १०४३ रुग्ण, तर वसईच्या ग्रामीण भागात ५१२ जणांना कोरोनाने बाधित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पालघर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये डहाणू ४६२, जव्हार १७३, मोखाडा ४३, तलासरी ८९, विक्रमगड १३७, वाडा ३६७ रुग्ण आढळलेले आहेत. यामध्ये आढळलेल्या एकूण २८२६ रुग्णांपैकी २०८८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे, तर ६९८ रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत.