शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

वसईमध्ये ७,२८६ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 01:00 IST

जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती : जीवघेण्या आजारातून बरे झालेल्यांचा सकारात्मक संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : वसई-विरार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र त्याच वेळी शहरातील ७ हजार २८६ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केल्यामुळे सकारात्मक संदेशही मिळाला आहे. जगण्याची इच्छाशक्ती असेल तर कोरोनावर सहज मात करता येते, हेच या बरे झालेल्या रुग्णांनी दाखवून दिले आहे.वसई-विरारमध्ये कोरोना-बाधितांचा वाढता आकडा पाहता स्थिती चिंताजनक आहे. त्यात मागील चार-पाच दिवसांत ३२ जणांचा मृत्यू झाल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. शनिवारी शहरात १८३, तर रविवारी १९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रविवारी रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण रुग्णांची संख्या ११ हजार १९० वर पोहोचली आहे. त्याच वेळी आतापर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २२७ इतकी झाली आहे, तर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या सात हजार २८६ इतकी असून तीन हजार ६७७ रुग्ण उपचार घेत आहेत. यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त असल्याने समाधानही व्यक्त होत आहे.दुसरीकडे वसई-विरार पालिकेला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मागील चार-पाच दिवसांत महापालिका हद्दीत ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सद्यस्थितीत ११ हजारांचा उंबरठा ओलांडून पुढे गेला आहे.महापालिका परिसरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सव्वादोनशेच्या पुढे गेला आहे. यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव चिंताजनक असून महापालिका प्रशासन कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात कमी पडत असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान, महापालिका परिसरात कोरोनाने शिरकाव केला तरी वसई तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रांना त्याची झळ बसली नव्हती, मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाला थोपवून धरण्यात यश मिळवलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रांतही कोरोनाने शिरकाव केला आहे. ग्रामीण भागातील २७ ग्रामपंचायतींच्या हद्दीत आता बाधितांचा आकडा ५०० च्या पुढे गेला आहे. तसेच अद्यापपर्यंत ग्रामीण भागात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.ग्रामीण भागात झपाट्याने संक्रमणपालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. पालघर तालुक्यातील रुग्णांनी एक हजार‘चा तर वसईच्या ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्णांनी ५०० चा टप्पा ओलांडला आहे. रविवारी दुपारपर्यंतच्या अहवालानुसार, पालघर तालुक्यामध्ये १०४३ रुग्ण, तर वसईच्या ग्रामीण भागात ५१२ जणांना कोरोनाने बाधित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पालघर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये डहाणू ४६२, जव्हार १७३, मोखाडा ४३, तलासरी ८९, विक्रमगड १३७, वाडा ३६७ रुग्ण आढळलेले आहेत. यामध्ये आढळलेल्या एकूण २८२६ रुग्णांपैकी २०८८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे, तर ६९८ रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत.