शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

विकास आघाडीचे ७ उमेदवार बिनविरोध

By admin | Updated: December 28, 2016 04:14 IST

या शहरातील नामांकित व प्रतिष्ठेच्या विक्रमगड विभाग सहकारी भात व गिरणी सहकारी संस्थेची निवडणुकीचा येत्या ६ जानेवारी घेण्यात येणार होती.

विक्रमगड : या शहरातील नामांकित व प्रतिष्ठेच्या विक्रमगड विभाग सहकारी भात व गिरणी सहकारी संस्थेची निवडणुकीचा येत्या ६ जानेवारी घेण्यात येणार होती. परंतु सर्वच उमेदवार बिनविरोध झाल्याने आता ६ जानेवारीनंतर नव्या चेअरमनची निवड होणार आहे. एकुण ११ जागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत अनुसुचित जमातीचे मधुकर खुताडे व भटक्या/विशेष मागासप्रवर्गातील प्रविण संखे हे दोघे अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत़ उर्वरीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी-६ जागा, ओबीसी-१, महिला राखीव-२ अशा ९ जागांकरीता २४ उमदेवार रिंगणात होते. त्यापैकी २२ डिसेबर रोजी माघारीच्या दिवशी काही सदस्यांनी माघार घेतल्याने विकास आघाडीकडून निवडणूक लढवित असलेल्या १५ सदस्यापैकी ७ उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत़ त्यामुळे साहजिकच विक्रमगड नगरपंचायतीप्रमाणे सोसायटीच्या निवडणुकीमध्येही विकास आघाडीची सरशी झाली आहे. दरम्यान गेल्या ३५ वर्षात या संस्थेची निवडणूकच झाली नव्हती़ प्रत्येकवेळी आपसांत संगनमत करुन चेअरमनपद एकाच व्यक्तीने भूषविलेले आहे़ मात्र यावेळी निलेश सांबरे, प्रमोद पाटील व नितीन वाडेकर यांनी पुढाकार घेऊन या निवडणुकीमध्ये आपले विकास पॅनल उतरविल्याने विरोधकांनी माघार घेणे पसंत केले त्यामुळे विकास आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध विजयी झाले. या संस्थेमध्ये एकुण मतदार सभासद संख्या ७१५ अशी मोठयास्वरुपाची आहे़ मात्र त्यामधील जवळ जवळ ६२० सभासद हे मयत आहेत़ त्यामुळे येवढया मोठयाकालावधीमध्ये मयतांचे वारस चढविण्यात आलेले नाही़ थातूर मातूर आॅडीट केले जात असल्याने हा प्रश्न कधी सभासदांच्या समोर आलाच नव्हता़ आॅडीटरने प्रत्येकवेळी मयतांचे वारस नोंदविण्याची सूचना केल्या असतांनाही आजतगायत वारस नोंद झालेली नसल्याने अनेक वारस सभासद या निवडणुकीपासून मुकलेले आहेत़ सध्या ७१५ पैकी फक्त ७० ते ८० सभासद जिवंत आहेत़या संस्थेची ३५ वर्षानंतर प्रथम निवडणूक घेण्यात येत आहे़ यावेळी निवडणुकीत विक्रमगड विकास आघाडीच्या माध्यमातुन या संस्थेवर १५ उमदेवार देऊन निवडणूक घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे ३५ वर्षाची संगनमताने बिनविरोध विजयी होण्याची परंपरा मोडीत निघाली़ आता एकुण ११ जागांपैकी ७ जागेवर विकास आघाडीने विजय श्री मिळवला असल्याने एकंदरीत या निवडणुकीवर विकास आघाडीचा प्रभाव स्पष्ट आहे़ (वार्ताहर)