शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

विकास आघाडीचे ७ उमेदवार बिनविरोध

By admin | Updated: December 28, 2016 04:14 IST

या शहरातील नामांकित व प्रतिष्ठेच्या विक्रमगड विभाग सहकारी भात व गिरणी सहकारी संस्थेची निवडणुकीचा येत्या ६ जानेवारी घेण्यात येणार होती.

विक्रमगड : या शहरातील नामांकित व प्रतिष्ठेच्या विक्रमगड विभाग सहकारी भात व गिरणी सहकारी संस्थेची निवडणुकीचा येत्या ६ जानेवारी घेण्यात येणार होती. परंतु सर्वच उमेदवार बिनविरोध झाल्याने आता ६ जानेवारीनंतर नव्या चेअरमनची निवड होणार आहे. एकुण ११ जागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत अनुसुचित जमातीचे मधुकर खुताडे व भटक्या/विशेष मागासप्रवर्गातील प्रविण संखे हे दोघे अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत़ उर्वरीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी-६ जागा, ओबीसी-१, महिला राखीव-२ अशा ९ जागांकरीता २४ उमदेवार रिंगणात होते. त्यापैकी २२ डिसेबर रोजी माघारीच्या दिवशी काही सदस्यांनी माघार घेतल्याने विकास आघाडीकडून निवडणूक लढवित असलेल्या १५ सदस्यापैकी ७ उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत़ त्यामुळे साहजिकच विक्रमगड नगरपंचायतीप्रमाणे सोसायटीच्या निवडणुकीमध्येही विकास आघाडीची सरशी झाली आहे. दरम्यान गेल्या ३५ वर्षात या संस्थेची निवडणूकच झाली नव्हती़ प्रत्येकवेळी आपसांत संगनमत करुन चेअरमनपद एकाच व्यक्तीने भूषविलेले आहे़ मात्र यावेळी निलेश सांबरे, प्रमोद पाटील व नितीन वाडेकर यांनी पुढाकार घेऊन या निवडणुकीमध्ये आपले विकास पॅनल उतरविल्याने विरोधकांनी माघार घेणे पसंत केले त्यामुळे विकास आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध विजयी झाले. या संस्थेमध्ये एकुण मतदार सभासद संख्या ७१५ अशी मोठयास्वरुपाची आहे़ मात्र त्यामधील जवळ जवळ ६२० सभासद हे मयत आहेत़ त्यामुळे येवढया मोठयाकालावधीमध्ये मयतांचे वारस चढविण्यात आलेले नाही़ थातूर मातूर आॅडीट केले जात असल्याने हा प्रश्न कधी सभासदांच्या समोर आलाच नव्हता़ आॅडीटरने प्रत्येकवेळी मयतांचे वारस नोंदविण्याची सूचना केल्या असतांनाही आजतगायत वारस नोंद झालेली नसल्याने अनेक वारस सभासद या निवडणुकीपासून मुकलेले आहेत़ सध्या ७१५ पैकी फक्त ७० ते ८० सभासद जिवंत आहेत़या संस्थेची ३५ वर्षानंतर प्रथम निवडणूक घेण्यात येत आहे़ यावेळी निवडणुकीत विक्रमगड विकास आघाडीच्या माध्यमातुन या संस्थेवर १५ उमदेवार देऊन निवडणूक घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे ३५ वर्षाची संगनमताने बिनविरोध विजयी होण्याची परंपरा मोडीत निघाली़ आता एकुण ११ जागांपैकी ७ जागेवर विकास आघाडीने विजय श्री मिळवला असल्याने एकंदरीत या निवडणुकीवर विकास आघाडीचा प्रभाव स्पष्ट आहे़ (वार्ताहर)