शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
7
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
8
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
9
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
10
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
11
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
12
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
13
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
14
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
15
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
16
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
17
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

विरार ते नायगाव दरम्यान ६ फ्लायओव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:26 IST

प्रवासाचे अंतर होणार कमी; वाहतूक कोंडीपासून नागरिकांची होणार मुक्तता

नालासोपारा : वसई विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, येणाºया वर्षांमध्ये महानगरपालिका विरार ते नायगाव या अंतरात सहा नवीन फ्लायओव्हर बांधणार आहेत. या पुलांच्या बाबतीत महानगरपालिकेने एमएमआरडीएला प्रस्ताव पाठवला आहे. या पुलांच्या निर्मितीसाठी साडे तीनशे कोंटींचा खर्च येणार आहे. या फ्लायओव्हरमुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे येण्या-जाण्यासाठी प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याने वेळेची बचत होणार असून भविष्यात वाहतूक कोंडीपासूनही सुटका होणार आहे.वसई विरार मधील जनतेच्या सोयीसुविधांच्या मागणीवरून विरार ते नायगाव या शहरा दरम्यान सहा नवीन फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावात विरार ते कोपरी, नारंगी, विराट नगर, नालासोपारा येथील ओस्तवाल नगरी, अलकापुरी, वसईच्या उमेळमान येथील पूर्व ते पश्चिम असे सहा नवीन पूल बांधणार आहे. नायगाव येथे एका पुलाचे काम अर्ध्याच्या वर झालेले असून लवकरच तो वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे नायगाव परिसरात राहणाºया नागरिकांचा फायदा होणार आहे. भविष्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील विरार, नालासोपारा आणि वसई याठिकाणी तीन फ्लायओव्हर आहेत. विरारच्या पुलावर अवजड वाहनांना वाहतुकीस निर्बंध असल्याने नारंगी फाटा येथील रेल्वे फाटकावरून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे वाहनांना येजा करावी लागते. नालासोपारा येथील पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. संध्याकाळच्या सुमारास अवजड वाहनांच्या येण्याजाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी दररोज होत असून जनतेची व वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तर वसई येथील पूर्व आणि पश्चिम प्रभाग जोडणारा जुना पंचवटी पूल धोकादायक झाल्याने बंद करण्यात आला असून नवीन पुलावर सकाळी आणि संध्याकाळी वाहतूककोंडी होत असते.या ठिकाणी मिळणार सुविधा.....नवीन पुलांची निर्मिती झाल्यावर वसई विरारमधील जनतेला अनेक सोयी सुविधा मिळणार आहेत. पूर्वेकडील प्रभागातून पश्चिमेकडील प्रभागात येणाºया जाणाºया नागरिकांचे प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याने वेळेची बचत होणार असून येण्याजाण्यासाठी लागणाºया गाडी भाड्यातही कपात होणार आहे.अनेक ठिकाणे रेल्वे स्थानकांच्या समोरासमोर आहेत. पण दुरून वळसा घालून त्याठिकाणी जावे लागते. पण आता हे ही अंतर कमी होणार आहे. विरार, नालासोपारा आणि वसई पश्चिमेकडील शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मॉल, थिएटर, समुद्रे किनारी येण्याजाण्यासाठी नागरिकांना लांबचा वळसा घेऊन प्रवास करावा लागणार नाही. त्यामुळे वाहतुककोंडीच्या समस्येपासून सुटका होणार !प्रस्तावित पुलांच्या ठिकाणी अतिक्र मण....ज्या ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली जाणार आहे. त्यांच्या उभारणीत अनेक अडचणी सुद्धा आहे. भविष्यात उभ्या राहणाºया पुलांच्या जागेत अतिक्र मणे झाली असून काहींनी कब्जा केल्याचेही दिसून येत आहे. हे अतिक्र मण हटविण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्तावित खर्चाच्या रकमेत वाढ होणार आहे. यामुळे काही ठिकाणी विरोधही केला जाईल ही गोष्ट नाकारता येत नाही.प्रवास होणार सुकर,नायगाव आणि वसई पश्चिमेकडे येण्यासाठी महामार्गावरून सातीवली, रेंजनाका, पंचवटी पूलावरून वसई, नायगाव येथे यावे लागते. नायगाव पूर्वपश्चिम जोडणारा पूल साकारला तर अंदाजे २५ किलोमीटरचे अंतर कमी होणार तर लोकांना नायगाव पूर्वेकडून नायगाव आणि वसई पश्चिमेकडे जाण्यासाठी लागणाºया वेळेची बचत होऊन इंधन देखील वाचणार आहे. या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असून लोकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. वसई पश्चिमेकडील न्यायालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, प्रांताधिकारी कार्यालय, आरटीओ, टीएलआर कार्यालयात येणाºया जाणाऱ्यांच्या वेळ व इंधनाची बचत होईल, तसेच वाहतूककोंडीची समस्याही सुटेल.वसई विरार मधील जनतेच्या मागणीवरून विरार ते नायगाव या शहरात सहा नवीन फ्लायओव्हर बांधण्याचा निर्णय घेतला असून एमएमआरडीएला प्रस्ताव पाठवला आहे. पुलांच्या निर्मितीसाठी साडे तीनशे कोटींचा खर्च लागणार आहे.- राजेंद्र लाड (मुख्य कार्यकारी अभियंता, वसई विरार शहर महानगरपालिका)

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक