शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पालघरमध्ये ५०० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणात शिळी भाजी दिल्याचा संशय; ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 09:39 IST

यापैकी ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, काही विद्यार्थी अत्यवस्थ आहेत.

पालघर : डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एकूण 33 आश्रमशाळांमध्ये बोईसर कांबळ गाव येथील मध्यवर्ती किचनमधून अन्नपुरवठा केला जातो. या किचनमधून पुरवण्यात आलेले अन्न खाल्ल्याने एकूण 39 आश्रमशाळांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी घडली, या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. यापैकी ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, काही विद्यार्थी अत्यवस्थ आहेत. या विद्यार्थ्यांना आदल्या दिवशीची भाजी पुन्हा दुसऱ्या दिवशी जेवणात दिल्याने हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

चवळीची भाजी खाल्ल्यानंतर जुलाब• डहाणू, पालघर, तलासरी आणि वसई या तालुक्यांत ३३ आश्रमशाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये कांबळ गाव येथील सेंट्रल किचनमधून दररोज सकाळचा नाश्ता, दोनवेळचे जेवण पुरवले जाते.• या सर्व विद्यार्थ्यांना सोमवारी सकाळी चवळीची भाजी आणि एक अंडे, तर संध्याकाळी दुधी आणि डाळीची भाजी जेवणात दिली.• त्यानंतर मंगळवारी सकाळी जेवण देताना पुन्हा चवळीची भाजी आणि एक अंडे दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. काही वेळेतच त्यांना उलट्या, जुलाब होण्यास सुरुवात झाली.• त्यामुळे सोमवारची चवळीची भाजी पुन्हा मंगळवारी विद्यार्थ्यांना दिली तर नाही ना? की ज्यामुळे मुलांना उलट्या झाल्या, असा प्रश्न आदिवासी संघटनेचे डॉ. सुनील पहाड यांनी उपस्थित केला आहे.

या आश्रमशाळांतील विद्यार्थी रुग्णालयांत रनकोळ आश्रमशाळेतील ९४, मसाड आश्रमशाळेतील ३, तवा येथील ६, महालक्ष्मी येथील २, खंबाळे येथील ३०, आंबेसरी येथील ४७, अस्वली येथील ३. कासपाडा येथील ४२. कळमदेवी येथील ३०, भाताने येथील ८, खुटल येथील १७, नानिवली येथील ६, बेटेगाव येथील ६, कांबळगावातील ५, नंडॉरेतील ६०, गोवाडेतील २८, सावरेतील १२, टेकाळेतील २०, टाकव्हालेतील ४ आणि लालठाणेतील ८ विद्यार्थी अशा सुमारे ५०० विद्यार्थ्यांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील ३३२ विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्यात आल्यानंतर त्यांच्यावरील धोका आता टळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले,

जिल्हाधिकारी बोडके, विवेक पंडित यांनी केली सेंट्रल किचनची पाहणी ज्या सेंट्रल किचनमधून तयार जेवण पुरवण्यात येते. त्या किचनला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि राज्यस्तरीय आदिवासी विकास विभागाच्या आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी भेट देऊन पाहणी केली. आश्रमशाळांमधील १५ हजार विद्यार्थ्यांना नाश्ता आणि दोन वेळचे तयार जेवण २१ बंदिस्त वाहनांमधून आश्रमशाळांमध्ये पोहोचवले जाते. वर्षभरापूर्वी टाटा ट्रस्टमार्फत 'ना नफा, ना तोटा तत्त्वावर सेंट्रल किचन चालवण्यात येत होते. यंदाच्या वर्षापासून आदिवासी प्रकल्प विभागार्फत सेंट्रल किचन चालवले जाते. किचनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि रक्ताचे नमुने घेण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरु आहे. दरम्यान, आमदार विनोद निकोले यांनी तलासरीत विर्थ्यांची विचारपूस केली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडे, डॉ. तन्वीर शेख यांनी सेंट्रल किचनची पाहणी केली.

सुमारे ५०० विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यातील ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. अन्नाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.- गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर

सेंट्रल किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव, जेवणाबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे त्याचे ऑडिट करून हा ठेका रद्द करण्याबाबत आदिवासी विकासमंत्रीविजयकुमार गावित यांच्याकडे तक्रार केली आहे.- राजेंद्र गावित, माजी खासदार 

टॅग्स :palgharपालघरStudentविद्यार्थीfood poisoningअन्नातून विषबाधा