शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

१२ हजार मजुरांचे ५ कोटी थकीत

By admin | Updated: April 1, 2016 03:20 IST

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील रोहयोवरच्या सुमारे १२ हजार मजूरांना गेले तीन महिने मजूरी मिळालेली नसून तिची थकबाकी ५ कोटीच्या आसपास

पालघर/वसई : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील रोहयोवरच्या सुमारे १२ हजार मजूरांना गेले तीन महिने मजूरी मिळालेली नसून तिची थकबाकी ५ कोटीच्या आसपास आहे. ती तातडीने अदा करा अन्यथा तीव्र लढा उभारावा लागेल, असा इशारा श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांनी मजुरी देण्याची सर्व प्रक्रिया वेळेत पार पाडल्यानंतर आॅन लाईन प्रक्रियेतून परस्पर मजूरी अदा केली जाते. परंतु वारंवार नो फंड अव्हेलेबल असा संदेश येतो अशी माहिती मिळाली. त्यानंतर माहिती घेतली असता केवळ जव्हार, मोखाडा, विक्रमगड नव्हे तर पालघरसह अन्य तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. रोजगार हमी योजना आयुक्तांकडे निधी प्राप्त झालेला नाही असे वारंवार सांगण्यात आले, अशी माहिती पंडित यांनी दिली.कुपोषित मुलांसाठी असलेली योजना बंद करणे, स्तनदा मातांसाठी जाहिर केलेली अमृत आहार योजना सुुरु न करणे, कमी रोजगार काढणे आणि केलेल्या कामाची मजूरी न देणे हे सारे संतापजनक आहे, असेही पंडित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या सात तालुक्यामध्ये रस्ते बांधणे, खड्डे खोदणे, इ. कामे हाती घेण्यात आली होती. या तालुक्यातील बारा हजार मजुरांच्या ९०४ मस्टरवर मागील डिसेंबर महिन्यापासून हे मजूर काम करीत आहेत. त्यांची फेब्रुवारी महिन्यापर्यंतची पाच कोटीहून अधिक मजुरी थकली आहे. असे असतानाही मजुरानी आज ना उद्या आपली मजुरी मिळेल या आशेवर आपले काम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे साडेसहा ते सात कोटीच्या घरात ही थकबाकी पोहचली असून मजुराच्या कुटुंबाची उपासमार सुरू झाली आहे.