शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

१२ हजार मजुरांचे ५ कोटी थकीत

By admin | Updated: April 1, 2016 03:20 IST

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील रोहयोवरच्या सुमारे १२ हजार मजूरांना गेले तीन महिने मजूरी मिळालेली नसून तिची थकबाकी ५ कोटीच्या आसपास

पालघर/वसई : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील रोहयोवरच्या सुमारे १२ हजार मजूरांना गेले तीन महिने मजूरी मिळालेली नसून तिची थकबाकी ५ कोटीच्या आसपास आहे. ती तातडीने अदा करा अन्यथा तीव्र लढा उभारावा लागेल, असा इशारा श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांनी मजुरी देण्याची सर्व प्रक्रिया वेळेत पार पाडल्यानंतर आॅन लाईन प्रक्रियेतून परस्पर मजूरी अदा केली जाते. परंतु वारंवार नो फंड अव्हेलेबल असा संदेश येतो अशी माहिती मिळाली. त्यानंतर माहिती घेतली असता केवळ जव्हार, मोखाडा, विक्रमगड नव्हे तर पालघरसह अन्य तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. रोजगार हमी योजना आयुक्तांकडे निधी प्राप्त झालेला नाही असे वारंवार सांगण्यात आले, अशी माहिती पंडित यांनी दिली.कुपोषित मुलांसाठी असलेली योजना बंद करणे, स्तनदा मातांसाठी जाहिर केलेली अमृत आहार योजना सुुरु न करणे, कमी रोजगार काढणे आणि केलेल्या कामाची मजूरी न देणे हे सारे संतापजनक आहे, असेही पंडित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या सात तालुक्यामध्ये रस्ते बांधणे, खड्डे खोदणे, इ. कामे हाती घेण्यात आली होती. या तालुक्यातील बारा हजार मजुरांच्या ९०४ मस्टरवर मागील डिसेंबर महिन्यापासून हे मजूर काम करीत आहेत. त्यांची फेब्रुवारी महिन्यापर्यंतची पाच कोटीहून अधिक मजुरी थकली आहे. असे असतानाही मजुरानी आज ना उद्या आपली मजुरी मिळेल या आशेवर आपले काम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुमारे साडेसहा ते सात कोटीच्या घरात ही थकबाकी पोहचली असून मजुराच्या कुटुंबाची उपासमार सुरू झाली आहे.