शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

वसईमध्ये 4.8 एफएसआयमुळे शहर विकासाला मिळणार चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:36 IST

सामान्यांना दिलासा : एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू  

आशीष राणेलोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसईतील नागरिकांना व विकासकांना नव्या विकास नियंत्रण नियमावलीची मागील ४ वर्षें प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात आता सर्वाधिक ४.८ एफएसआय मंजूर झालेला असून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचाही मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने याआधीच मंजूर केलेली एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली नुकतीच लागू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या नगररचना विभागाचे प्रमुख संचालक वाय.एस. रेड्डी यांनी ‘लोकमत’ला दिली.

वसई-विरार शहरात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आल्याने आता शहरातील बांधकामासाठी तिप्पट वाढीव चटई क्षेत्रफळ मंजूर करण्यात आले आहे. या नव्या विकास नियंत्रण नियमावलीमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारी स्वस्त घरे व त्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र या नवीन एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत वसईतील हरितपट्ट्याबाबत विशेष काळजी घेत त्यास कुठेही धक्का न लावता पूर्णतः संरक्षित ठेवण्यात आली आहे. स्वस्त घरे, वाणिज्य, उद्योग आणि पर्यटन आदी क्षेत्राला चालना मिळणाऱ्या तरतुदी या नव्या नियमावलीत करण्यात आल्या आहेत. याखेरीज वसई-विरार शहरात झोपडपट्टी पुनर्विकास योजनाही अंमलात येणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली असावी यासाठी राज्याच्या नगरविकास खात्याने भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात तत्कालीन प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने हा आराखडा तयार करून २८ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केला होता. त्यावर हरकती व  सूचना मागविल्यानंतर तो पुन्हा अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आला आहे.

वसई-विरार महापालिकेनेही नवीन एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केल्याने  वसई-विरार शहरांच्या विकासाला गती व चालना मिळेल. सोबत  प्रीमियममध्ये जरी कपात केली असली तरी एफएसआय तिप्पट झाल्याने बांधकामे वाढून सर्वसामान्यांना स्वस्तात घरे मिळतील. एसआरए योजना, उत्तम दर्जाचे उद्योगधंदे व  पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल.- वाय.एस. रेड्डी, प्रमुख संचालक, नगररचना विभाग, वसई-विरार शहर महानगरपालिका