शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वसईत जोरदार पाऊस, मिठागरात 400 जण अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 13:52 IST

वसई पूर्वेकडील मिठागरात मुसळधार पावसामुळे ४०० जण अडकले.

वसई : मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटींग सुरु असतानाच वसई-विरारला ही मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. वसई पूर्वेकडील मिठागरात मुसळधार पावसामुळे पाणी शिरलं आहे. या मिठागरात ४०० जण अडकल्याची माहिती आता समोर आली आहे. या परिसरात मिठागरात काम करणाऱ्या कामगारांची वस्ती आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने या वस्तीत पाणी शिरलं आहे. 

पालघर आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी विवेकानंद कदम आणि वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पालिका मदत पथक आणि महसूल विभागाचे कर्मचारी नवघर मिठाघर येथे पोहचले असून तेथील काम करणाऱ्या 200 ते 250 कामगारांना होड्यांद्वारे काढण्यात येत आहेत. या मिठाघर परिसरात नेहमीच पाणी साचते आणि तेथील कामगारांना प्रशासन काळजी घेण्याच्या सूचना देत असते. केवळ वसईचा हा ग्रामीण भागच नाही तर शहरी भागातही पाणी साचले आहे. त्यामुळे होड्या चालवून प्रशासन मदत कार्य करत असून  अडकलेल्या कामगारांना काढण्यात येत आहे.

वसई, विरार, नालासोपाऱ्यात अधून मधून मुसळधार पावसासह संततधार सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. पावसामुळे जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे वसई-विरार येथील कॉलेज-शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. डहाणूहून विरारकडे जाणारी उपनगरीय रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. वाणगाव, बोईसर, पालघर, केळवे रोड आदी स्थानकांवर ट्रेनही थांबवण्यात आल्या आहेत.  

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस