शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

पुन्हा एकदा तारिख पे तारीख! २९ गावे वसई विरार महानगरपालिकेत राहणार की वगळण्यात येणार; आता पुन्हा अंतिम सुनावणी ४ मार्चला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 21:21 IST

वसई-विरार शहर महापालिकेतून 29 गावे वगळण्याच्या महत्त्वाच्या याचिका प्रकरणावर गुरुवार दि.25 फेब्रुवारी रोजी मा.मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. किंबहुना महापालिकेतून 29 गावे वगळतील की राहतील यावर देखील गुरुवारी ऐतिहासिक फैसला येणार होता.

आशिष राणे,वसई 

वसई-विरार शहर महापालिकेतून 29 गावे वगळण्याच्या महत्त्वाच्या याचिका प्रकरणावर गुरुवार दि.25 फेब्रुवारी रोजी मा.मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. किंबहुना महापालिकेतून 29 गावे वगळतील की राहतील यावर देखील गुरुवारी ऐतिहासिक फैसला येणार होता.

मात्र 29 गावे व त्या संदर्भातील सर्व एकत्रित याचिका इतर महत्त्वाच्या याचिकेवरील सुनावणी  संध्याकाळी 4.30 वाजले तरी सुरूच राहीली होती,किंबहुना गावांची एकत्रित  याचिका यामुळे सुनावणीसाठी पटलावर न आल्याने अखेर मा मुंबई उच्च न्यायालयाने 29 गावांच्या याचिकेवर पुढील आठवड्यात दि,4 मार्चला दुपारी 2.30 वाजता पटलावर याचिका घेणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीनं पालघर जिल्हा सचिव मिलिंद खानोलकर व याचिकाकर्ते ऍड.जिमी घोंनसालवीस यांनी लोकमतला दिली.

दरम्यान महापालिकेतून 29 गावे वगळतील की जैसे थे  राहतील याकडे संपूर्ण वसईकरांचे व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते परंतु पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या बाजूनं  निर्णय न आल्याने हिरमोड झाला आहे. परिणामी मागील 10 वर्षापासून हे गावांचे प्रकरण मा.मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, 

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या  निवडणूक वचननामा व आश्वासना नुसार 29 गावे वगळली जातील अशी मोठी आशा येथील पश्चिम पट्ट्यातील ग्रामस्थांना आहेच तर मागील वर्षी मार्च 2020 पासून  कोरोनामुळे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला आता पुन्हा प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने 29 गावांचा प्रश्न पुन्हा रखडण्याची शक्यता अधिक निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य शासनाने पंधरा दिवसांपूर्वीच राज्य शासनाच्या वतीनं तात्काळ सुनावणी घेण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यामुळे मा मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी सर्व याचिकाकर्त्यांना आपली बाजू मांडून अंतिम सुनावणी घेण्यासाठी दि. 25 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती. आणि दि 25 फेब्रुवारी ला गुरुवारी दुपारी मा मुंबई  उच्च न्यायालयाच्या 46 क्रमांकाच्या दालनात  मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्यापुढे ही सुनावणी होणार होती. परंतु संध्याकाळी उशिरा पर्यंत याचिकेवर सुनावणीच न झाल्याने अखेर पुन्हा पुढची 4 मार्च तारीख देण्यात आली.

29 गावे वगळली तर वसई विरार शहर महापालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी नक्कीच पुढे ढकलली जाईल हे तर सर्वश्रुत आहे.

दहा वर्ष स्थगिती ; तर महापालिकेचा जैसे थे आदेश तांत्रिक मुद्यावर रद्द करावा ! अन्यथा महापालिका निवडणूका ही लांबतील ?

महापालिकेने गावे वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने आणि महापालिकेची याचिका जर आज तांत्रिक मुद्द्यावर रद्द केली तर तात्काळ हा मुद्दा निकाली निघेल आणि जर गावे वगळण्याचा निर्णय झालाच तर शहराची रचना ही बदलेल त्यामुळे नव्याने प्रभाग रचना ,आरक्षण सोडत त्यावर पुन्हा सूचना व हरकती होतील आणि निवड प्रक्रिया आणखी लांबणीवर पडेल

तर आता पाहू या पुढील तारीख पी तारीख चा हा सिलसिला कुठपर्यंत सुरू राहतो पुन्हा एकदा पुढील 4 मार्च गुरुवारच्या सुनावणी कडे गावकऱ्यांचे व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र