शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
3
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
4
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
5
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
6
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
7
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
8
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
9
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
10
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
11
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
12
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
13
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
14
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
15
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
16
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
17
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
18
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
19
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
20
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?

२९ गावे : सरकारी भूमिका संशयास्पद

By admin | Updated: September 25, 2015 02:08 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेतील २९ गावांचा तिढा दिवसेंदिवस अधिक जटील होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सतत सुनावणी पुढे ढकलली जात

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील २९ गावांचा तिढा दिवसेंदिवस अधिक जटील होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सतत सुनावणी पुढे ढकलली जात असल्यामुळे पक्षकारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अखेरच्या क्षणी राज्यसरकारकडून अचानकपणे मुदत वाढवून मागण्यात येत असल्यामुळे सरकारची भूमिका संशयास्पद ठरू लागली आहे. काल झालेल्या सुनावणीतही राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ मागितली परंतु त्यांनी मागितलेला अवधी न्यायालयाने दिला नाही. येत्या ३० सप्टेंबर रोजी ही सुनावणी होत आहे.एका याचिकेवरील सुनावणी पूर्ण होऊन निर्णय बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इतर याचिकांवरही लवकरात लवकर सुनावणी पूर्ण होऊन या संपूर्ण प्रश्नाचा निकाल लागेल अशी अपेक्षा वसईकर नागरीकांकडून व्यक्त होत आहे. काल २३ तारखेला सुनावणी सुरू झाली असता अचानक राज्य सरकारच्या वकिलांनी पुन्हा मुदतवाढीचा अर्ज सादर केल्यामुळे न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली व त्यांनी मागितलेल्या मुदतवाढीत कपात करत ७ दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. राज्य सरकारच्या या हालचालीमुळे राज्य सरकारच्या हेतूबद्दल सर्वत्र संशय व्यक्त होत आहे. सुमारे साडेतीन वर्षे या प्रश्नावर दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणीच होऊ शकली नव्हती. सतत पडणाऱ्या तारखांमुळे पक्षकार नाराज आहेत.