शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

सायबर शाखेने मिळवून दिले २६ नागरिकांचे मोबाईल

By धीरज परब | Updated: October 7, 2023 19:04 IST

पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील नागरिक मोबाईल हरवले वा गहाळ झाल्यास विविध पोलीस ठाण्यात तसेच ऑनलाईन तक्रारी दाखल करतात.

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर शाखेने २६ नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळवून दिले आहेत. ह्या २६ मोबाईलची किंमत ४ लाख २० हजार असल्याचे सांगण्यात आले. 

पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील नागरिक मोबाईल हरवले वा गहाळ झाल्यास विविध पोलीस ठाण्यात तसेच ऑनलाईन तक्रारी दाखल करतात. तसेच ऑनलाईन सीईआयआर पोर्टलवर प्राप्त तक्रारींचे देखील सायबर गुन्हे कक्ष यांनी कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबूरे यांनी दिले आहेत. 

सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उप निरीक्षक प्रसाद शेनोळकर सह संतोष चव्हाण, माधुरी धिंडे, गणेश इलग, आमीना पठान, पल्लवी निकम, सुवर्णा माळी, कुणाल सावळे, प्रशांत बोरकर, प्रविण सावंत, राजेश भरकडे, विजय खोत, आकाश बोरसे, सोनाली मोरे यांच्या पथकाने नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईल बाबत कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास, विश्लेषण व पाठपुरावा करून २६ नागरिकांचे मोबाईल परत मिळवले.  

सहायक पोलीस आयुक्त भास्कर पुकळे यांच्यासह सायबर शाखेच्या पथकाच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. यावेळी सायबर शाखेने नागरिकांना सायबर गुन्हे विषयक माहिती व मार्गदर्शन केले.  

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर