शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

माटगावमध्ये २५ गायींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 00:27 IST

वाणगाव जवळच्या माटगाव गावच्या परिसरातील शेतात, गवतात तसेच झाडाझुडपात दूरवर विखुरलेल्या जागेत, २५ गाई मृत आढळल्या आहेत. अद्याप शोधकार्य सुरू असल्याने, मृत गार्इंचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही.

डहाणू : वाणगाव जवळच्या माटगाव गावच्या परिसरातील शेतात, गवतात तसेच झाडाझुडपात दूरवर विखुरलेल्या जागेत, २५ गाई मृत आढळल्या आहेत. अद्याप शोधकार्य सुरू असल्याने, मृत गार्इंचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही. या मोकाट गायी असल्याने त्यांना कोणी मालक नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला असावा, हे शवविच्छेदनानंतरच समजणार आहे.माटगावच्या आसपास प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, मिरची बागायती आहेत. त्यात भाजीपाला किंवा अन्य पिकांची लागवड केली जाते. रात्रीच्या सुमारास साठ ते सत्तर मोकाट गार्इंचा तांडा, कुंपण तोडून किंवा उड्या मारून बागेत घुसतात आणि बाग फस्त करून टाकतात. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. याला कंटाळून हे बागायतदार एखाद्या वांग्यात अथवा भाजीपाल्यात थायमेट सारखे जहाल कीटकनाशक भरून, बागेच्या बाहेर लांबवर फेकून देतात. ती खाऊन गुरे मरतात. गायींच्या मृत्यूची ही एक शक्यता आहे. तर काही बागायतदार भाजीपाला लागवडीवर कीटकनाशकांची फवारणी करतात. हा भाजीपाला गुरांनी खाल्यानंतर गुरे मृत होतात, ही दुसरी शक्यता आहे.याबाबत वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार आवटे यांनी शोधकार्य सुरू केले आहे. यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच मृत गार्इंच्या विल्हेवाटीसाठी खड्डे खोदण्याकरता, जेसीबी मशीनही मागविण्यात आली आहे. याबाबत नेमके काय घडले असावे, याची माहिती हा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर उघड होणार आहे.

टॅग्स :cowगायVasai Virarवसई विरार