शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

भाईंदरमध्ये सदनिकेचा भाग कोसळून दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 14:43 IST

महापालिकेने सदर इमारत ही जुनी झाली असून पडण्याचा धोका असल्याची नोटीस बजावली होती

मीरारोड - भाईंदर पश्चिमेकडील बावन जिनालय जवळील ४० वर्ष जून्या इमारतीच्या एका सदनिकेचा भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. रविवारी ( 22 जुलै) रात्री नवपार्श्वनगर - १ या इमारतीच्या सदनिकेचा भाग कोसळल्याने दोन जण जखमी झाले आहेत. तर शुक्रवारी महापालिकेने सदर इमारत ही जुनी झाली असून पडण्याचा धोका असल्याची नोटीस बजावली होती. मात्र रहिवासी अजूनही इमारत रिकामी करण्यास तयार नसल्याने अडचण झाली आहे.  

रविवारी रात्री ९ च्या सुमारास नवपार्श्वनगर क्र. १ या इमारतीच्या बी विंगमधील पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सदनिका क्रमांक १०८ च्या बाल्कनीचा भाग कोसळला. जितेन गंगर हे  सदनिकेत कुटुंबासह राहतात. जितेन हे देखील स्लॅबसह खाली पडल्याने त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. तर एक जण खाली उभा असल्याने त्याच्या अंगावर काही भाग पडल्याने तो देखील किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान मदतीसाठी आले. महापौर डिंपल मेहता, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, माजी महापौर गीता जैन, नगरसेवक रवी व्यास आदीनी पाहणी केली. सदर सदनिका रिकामी करण्यात आली आहे. 

या इमारतीत ३२ सदनिका व २२ दुकाने आहेत. भाजपाचे उत्तन मंडळ महासचिव शैलेश म्हामुणकर यांनीच सदर इमारत धोकादायक अवस्थेत असल्याची तक्रार महापालिकेस केली होती. म्हामुणकर यांच्या तक्रारीनुसार पालिकेने १९ जुलै रोजी इमारतीची पाहणी केली होती. तर २० जुलै रोजीच महापालिकेने इमारतीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. इमारतीस भेगा पडल्या असून आतील सळई गंजल्या आहेत. १०४ क्र. च्या सदनिकेच्या गॅलेरीस पण मोठ्या भेगा गेल्याचे म्हटले होते. तर इमारतीची संरचनात्मक तपासणी करून त्याचा अहवाल २९ जुलै पर्यंत सादर करण्यास कळवले होते. इतकेच नव्हे तर या दरम्यान अपघात होऊन मनुष्यहानी झाल्यास त्याची जबाबदारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर निश्चित करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा सुद्धा कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी दिला होता.

दरम्यान इमारतीतील रहिवाशी मात्र इमारत दुरुस्ती करून घेऊ असा पवित्रा घेऊन आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाला असून इमारतीचा भाग किंवा इमारत कोसळल्यास मनुष्यहानी वा जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली आहे. तर काही लोकप्रतिनिधींनी राजकीय हस्तक्षेप सुरु केल्याने पालिकेची देखील कोंडी झाली आहे .  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार