शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
3
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
4
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
5
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
6
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
7
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
8
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
9
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
10
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
11
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
12
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
13
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
14
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
15
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
16
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
17
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
18
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
19
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
20
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे

राेहयाे मजुरांचे 14.57 काेटी थकीत; निधीअभावी योजनेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:10 IST

उपासमारीमुळे आदिवासींवर स्थलांतराची वेळ

रवींद्र साळवेमोखाडा : ‘मागेल त्याला काम आणि १५ दिवसांत दाम’ या तत्त्वावर आधारलेल्या व स्थानिक पातळीवर रोजगाराची हमी देणाऱ्या रोहयो योजनेला निधीअभावी ब्रेक लागला आहे. जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड येथील रोहयोंतर्गत काम केलेल्या मजुरांची १४ कोटी ५७ लाखांची थकबाकी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळाली नसल्याने ‘रोजगार हमी योजना’ धोक्यात आली आहे. केंद्राकडून आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने त्यातच  संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

 कोरोनाच्या काळात आदिवासींना स्थानिक पातळीवर रोजगारांना संजीवनी देणारी ही योजना शासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आदिवासींच्या स्थलांतराला कारणीभूत ठरणार आहे.  जिल्ह्यात शेल्फवर मुबलक प्रमाणात कामे असून ९५ टक्के कामगारांना मागणी केल्यानंतर आठवडाभरात काम देण्यात येते, अशी स्थिती राहिली आहे.

जिल्ह्यातील दोन महिन्यांपासून केंद्र शासनाकडून आवश्यक निधी मिळत नसल्याने काम केलेल्या कामगारांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच, मनरेगाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे डिजिटल स्वाक्षरी अपलोड हाेत नसल्याचे त्यामागे कारण असल्याचे सांगण्यात येते. पालघर जिल्ह्यात हजारो मनरेगा कामगारांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. कामाचा मोबदला मिळत नसल्याने योजनेंतर्गत कामगारांमध्ये नाराजी आहे.

तसेच, रोजगार हमीवर काम करणारी सर्व कुटुंबे ही दारिद्र्यरेषेखालील असून मजुरी न मिळाल्याने यापैकी अनेक कुटुंबांवर कठीण प्रसंग ओढवला असल्याचे दिसून येते.  विक्रमगड तालुक्यात जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत ‘रोजगार हमी योजने’चे ७ कोटी ८१ लाख ३५ हजार ४२३ रुपये, जव्हार तालुक्यात ४ कोटी ५६ लाख ७७ हजार ६४ रुपये, तर मोखाडा तालुक्यात दाेन कोटी १९ लाख ५३ हजार ८३३ रुपये मजुरी प्रलंबित आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार