शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

१२२ करोड घोटाळ्याच्या फाईली वसई-विरार महापालिकेत गायब ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 23:51 IST

कंत्राटदार दोषी आहेत पण यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी साथ दिली नसती तर इतका मोठा घोटाळा होऊच शकला नसता

नालासोपारा : वसई तालुक्यात १२२ करोडचा घोटाळा केला म्हणून २५ कंत्राटदारावर विरार पोलीस ठाण्यात २ मार्च २०१९ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याच्या फाईली विरार मुख्यालयातून महानगरपालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी गायब करण्याच्या बेतात असून पोलिसांना उल्लू बनवण्यासाठी हे सर्व षड्यंत्र सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून दैनिक लोकमतला कळले आहे. कंत्राटदार दोषी आहेत पण यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी साथ दिली नसती तर इतका मोठा घोटाळा होऊच शकला नसता. कर्मचाऱ्यांचे शासनाला, कामगार आयुक्तांना, पीएफचे पैसे भरण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची होती मग लेखा विभाग, ऑडीटर त्यावेळी काय करत होते? दरवर्षी ऑडिट होत होते की नाही ? वास्तविक सदर घोटाळ्याच्या गुन्ह्याची तक्रार ऑडीटरने विरार पोलीस ठाण्यात देणे गरजेचे होते पण त्याने ती दिलीच नाही. म्हणून महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता शक्कल लढवली असून ते सगळ्या फाईली गायब करण्याच्या बेतात असल्याचे सूत्रांकडून कळते. तसेच तपासात पोलिसांकडून विचारणा झाली तर आमच्याकडे रेकॉर्ड नाही म्हणून संबंधित अधिकाºयांना नोटीस बजावण्यात आले असल्याचे सांगणार असल्याचा प्लॅन आखल्याचेही कळते.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सेवानिवृत्त आणि कार्यरत असणाºया व या घोटाळ्यास जवाबदार म्हणून चार जणांना २०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात नोटिसा काढून त्यांना व्यक्तीश: जवाबदार धरून त्यांच्यावर जवाबदारी निश्चित केली असून आक्षेपार्ह रक्कम न भरल्यास निवृत्ती देयकातून तीची वसुली करण्याची कारवाई करणार असल्याच्या नोटिसा धाडल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. तर एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने हेरवाडे यांच्या नोटीसीला कायदेशीर उत्तर दिले असल्याचेही बोलले जात आहे. एखादा अधिकारी सेवानिवृत्त होतो त्यावेळी नियमानुसार त्या अधिकाऱ्यांची फाईल आयुक्तांकडे जाते की तुमच्यावर काही थकबाकी नाही ना ? तुमच्यावर काही आक्षेप आहे का ? कोणता आरोप आहे का ? ही तपासणी झाल्यानंतरच सेवानिवृत्त केले जाते. ज्या सेवानिवृत्त अधिकाºयांना त्यावेळी क्लीन चिट देण्यात आली मग आता कशी काय थकबाकी असल्याची नोटीस काढण्यात आली आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

१२२ करोड घोटाळ्याच्या फाईली नवघर माणिकपूर महानगरपालिकेतील महिला विभागाच्या कार्यालयातून भांडार विभागाच्या प्रमुखाकडून विरारच्या मुख्यालयातून आलेल्या अधिकाºयाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नेल्या असल्याचेही कळते. या फाईली गायब करून हे प्रकरण सेवानिवृत्त व कार्यरत अधिकाऱ्यांच्या अंगावर शेकविण्याचा घाट वरिष्ठ अधिकाºयांकडून सुरू असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.त्यामुळे तक्रारदार मनोज पाटील यांनी तात्काळ फाईली ताब्यात घेण्यास अथवा गहाळ झाल्यास आपण जबाबदार असल्याचे पत्र पोलिस व आयुक्तांना देणे गरजेचे आहे असा दावा केला आहे.

सदर गुन्ह्याप्रकरणी न्यायालयात अटकपूर्व जामिनावर सुनावणी असून मंगळवारी ४ जूनला सुनावणी आहे. कोणत्या कंत्राटदाराने कितीचा अपहार केला, कोणाचा किती रोल आहे याचा तपास चालू आहे. - महेश शेट्टे (पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा)

घोटाळ्याच्या फाईली अशा कशा गायब होतील. त्यांचे रेकॉर्ड आहे. पोलिसांना माहिती देण्यासाठी फाईली नवघर माणिकपूर महानगरपालिकेच्या कार्यालयातून मुख्यालयात आणल्या असतील. तरी त्या फाईलीची नोंद राहते, इनवर्ड आणि आऊटवर्ड असणार, फाईली कुठे कुठे गेल्या व कुठे कुठे आहेत याच्या नोंदी असतील. - बळीराम पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका

नेमके काय होते प्रकरण... : वसई विरार मनपाच्या ३१६५ ठेका कर्मचाºयांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता या ठेकेदारांनी हडप केला आहे. एकूण १२२ करोड च्या घोटाळ्यात २९ करोड ५० लाख रुपयांचा शासकीय महसूलचाही समावेश असून ९२ करोड ५० लाख रुपये कर्मचाºयांच्या पगाराचे आहेत. ठेका कर्मचाºयांच्या पगारावरच डल्ला मारल्या प्रकरणी मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे काय झाले ?: लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या जाहीर प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरारला आले होते. एकनाथ शिंदे यांनी मागणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये वसई विरार महानगरपालिकेची एस आय टी मार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते पण निवडणुका पार होताच हे आश्वासन हवेत विरल्याची चर्चा सध्या वसई तालुक्यात सुरू आहे.

घोटाळा नक्की कितीचा ? : १२२ करोडचा घोटाळा झाला म्हणून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पण याची वास्तविकता पाहता हा घोटाळा १० पटीपेक्षा जास्त असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. म्हणून या घोटाळ्याची एस आय टी चौकशी केली तर दूध का दूध आणि पानी का पानी होऊन याचे बिंग फुटून घोटाळा कितीचा झाला हे उघड होईल तर या घोटाळ्यास नक्की कोण जवाबदार आहे हे सुद्धा बाहेर येईल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCorruptionभ्रष्टाचार