शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला देणार १ ते ५ कोटींचा शासकीय निधी, सुनील भुसारा यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:00 IST

gram panchayat : विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होतील, त्या ग्रामपंचायतीना प्राधान्याने सर्व विभागांचा मिळून जवळपास १ ते ५ कोटीपर्यंतचा शासकीय निधी मिळवून दिला जाईल

मोखाडा -  काही महिन्यांवर ग्रामपंचायत निवडणुका येणार आहेत. अशावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुका खेळीमेळीने लोकशाहीच्या उत्सवाप्रमाणे व्हायला हव्यात, मात्र काही लोकांच्या आडमुठेपणामुळे निवडणुका रक्तरंजित होतात. आर्थिक नुकसान होते. याशिवाय नातेसंबंधात वाईटपणाही येतो. यामुळे होता होईल तेवढे प्रयत्न करून निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होतील, त्या ग्रामपंचायतीना प्राधान्याने सर्व विभागांचा मिळून जवळपास १ ते ५ कोटीपर्यंतचा शासकीय निधी मिळवून दिला जाईल, अशी घोषणा आ. सुनील भुसारा यांनी केली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमानिमित्ताने आयोजित बैठकीप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली आहे. लोकशाही बळकट व्हावी यासाठीच आपला प्रयत्न असून गावागावांत फूट पडू नये, संबंध खराब होऊ नयेत, यासाठीचा हा प्रयत्न असून बिनविरोधच्या निमित्ताने गावचा विकास करण्यासाठी एकप्रकारे एकोपाच निर्माण होणार असल्याने ही घोषणा केल्याचे भुसारा यांनी सांगितले. भुसारा म्हणाले की, राजकारणात आजही निष्ठेला खूप महत्त्व असून मी आज आमदार म्हणून तुमच्यासमोर उभा आहे, हेही निष्ठेचे फळ आहे. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळकटी देण्याची जबाबदारी माझी आहे. मात्र, तुम्हीही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून काम करत असताना लोकांची कामे करा. त्यांच्या घरापर्यंत जा. त्यांच्या अडचणी सोडवा. ज्या तुमच्याकडून सुटणार नाही, त्या मला सांगा, पण आपला वेळ लोकांसाठी, समाजासाठी द्या. तुमच्या कामाची दखल पक्ष नक्की घेईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी गटनेते नररेश आकरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर, जि. प. सदस्य हबीब शेख, पं. स. सदस्य लक्ष्मीबाई भुसारा, तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी, उपाध्यक्ष रामदास कोरडे, प्रदेश सदस्य रघुनाथ पवार आदी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतVasai Virarवसई विरार