शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

प्रशासन जागे झाले, गढूळ पाणी घेऊन आले, दातिवरेत दूषित पाणी घेऊन टँकर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 13:04 IST

Palghar News: गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला, मात्र टँकरचे पाणी दूषित, गढूळ असल्याने ‘असले पाणी पिऊन आम्ही आजारी पडायचे का?’ असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांना बाटलीतूनच तहान भागवावी लागत आहे. 

- हितेन नाईकपालघर - पालघर तालुक्यातील दातिवरे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल या विषयावर ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला खडबडून जाग आली. याची गंभीर दखल घेत गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला, मात्र टँकरचे पाणी दूषित, गढूळ असल्याने ‘असले पाणी पिऊन आम्ही आजारी पडायचे का?’ असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांना बाटलीतूनच तहान भागवावी लागत आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला चांगले धारेवर धरले. यावेळी कार्यकारी अभियंता ए. ए. मुळे यांनी दुरुस्ती केल्याने पाणी सुरू झाल्याची माहिती पुरवली आहे. मात्र, दातिवरे गावाला दुरुस्तीनंतर थोडेसे पाणी आले नंतर बंद झाले.  

केळवे-माहीम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही १७ गावांसाठी बनवलेली आहे. १९८० सालच्या ४४ वर्षे जुन्या असलेल्या या योजनेकडे गावावर सत्ता गाजविणाऱ्या अनेक राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना महिन्यातून एकदा पिण्याचे पाणी मिळते. याव्यतिरिक्त त्यांना पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन तहान भागवावी लागते. पाणी मिळावे, म्हणून मंडल अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्याचे ग्रामविकास अधिकारी एस. बी. ठाकरे यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर झालेल्या बैठकीत जीवन प्राधिकरण विभागाने मायखोप येथील कामाची दुरुस्ती झाल्यावर पाणी आल्याचा दावा केला. मात्र, तो खोटा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

आणखी एक वर्ष दातिवरेसह १७ गावांतील लोकांसाठी जीवन प्राधिकरणाकडून सुमारे ५६ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कमीतकमी एक वर्षभराचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत दातिवरे गावातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न अधांतरीच लटकणार.

टॅग्स :palgharपालघरWaterपाणी