शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

प्रशासन जागे झाले, गढूळ पाणी घेऊन आले, दातिवरेत दूषित पाणी घेऊन टँकर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 13:04 IST

Palghar News: गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला, मात्र टँकरचे पाणी दूषित, गढूळ असल्याने ‘असले पाणी पिऊन आम्ही आजारी पडायचे का?’ असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांना बाटलीतूनच तहान भागवावी लागत आहे. 

- हितेन नाईकपालघर - पालघर तालुक्यातील दातिवरे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल या विषयावर ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला खडबडून जाग आली. याची गंभीर दखल घेत गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला, मात्र टँकरचे पाणी दूषित, गढूळ असल्याने ‘असले पाणी पिऊन आम्ही आजारी पडायचे का?’ असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांना बाटलीतूनच तहान भागवावी लागत आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला चांगले धारेवर धरले. यावेळी कार्यकारी अभियंता ए. ए. मुळे यांनी दुरुस्ती केल्याने पाणी सुरू झाल्याची माहिती पुरवली आहे. मात्र, दातिवरे गावाला दुरुस्तीनंतर थोडेसे पाणी आले नंतर बंद झाले.  

केळवे-माहीम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही १७ गावांसाठी बनवलेली आहे. १९८० सालच्या ४४ वर्षे जुन्या असलेल्या या योजनेकडे गावावर सत्ता गाजविणाऱ्या अनेक राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना महिन्यातून एकदा पिण्याचे पाणी मिळते. याव्यतिरिक्त त्यांना पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन तहान भागवावी लागते. पाणी मिळावे, म्हणून मंडल अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्याचे ग्रामविकास अधिकारी एस. बी. ठाकरे यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर झालेल्या बैठकीत जीवन प्राधिकरण विभागाने मायखोप येथील कामाची दुरुस्ती झाल्यावर पाणी आल्याचा दावा केला. मात्र, तो खोटा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

आणखी एक वर्ष दातिवरेसह १७ गावांतील लोकांसाठी जीवन प्राधिकरणाकडून सुमारे ५६ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी कमीतकमी एक वर्षभराचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत दातिवरे गावातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न अधांतरीच लटकणार.

टॅग्स :palgharपालघरWaterपाणी