शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

‘त्या’ जि.प. शाखा अभियंत्याचा मृत्यू

By admin | Updated: June 20, 2016 01:45 IST

जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता संजय देवराव बढीये (५१) यांचा सावंगी (मेघे)....

खळबळ : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्षवर्धा : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता संजय देवराव बढीये (५१) यांचा सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात रविवारी सायंकाळी ५ वाजता मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन रोखठोक भूमिका घेते वा प्रकरणावर पडदा टाकते, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. सदर घटनेने बढीये कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीय शोकमग्न अवस्थेत असल्यामुळे त्यांची याबाबतची भूमिका कळू शकली नाही.शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दोन सदस्यांनी शाखा अभियंता संजय बढीये यांच्यावर घणाघाती आरोप केले. त्यांचे नाव घेऊन हा अधिकारी भ्रष्ट आहे. त्याला तातडीने निलंबित करून त्याची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी त्या दोन सदस्यांनी लावून धरली. वास्तविक, कोणत्याही प्रकरणात बढीये यांनी भ्रष्टाचार केला नसल्यामुळे झालेल्या या गंभीर आरोपामुळे त्यांची मनस्थिती ढासळली, यामुळेच त्यांना बे्रन हॅम्रेज झाले असावे, अशी चर्चा जि.प. वर्तुळात आहे.शनिवारी बढीये यांना सावंगी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची स्थिती इतकी नाजुक होती की त्यांना अतिदक्षता विभागात नेण्यापूर्वीच कृत्रिम जीवन प्रणाली लावावी लागली. त्यांना वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीने प्रयत्न केले. मात्र यात त्यांना यश आले नाही. आज संजय बढीये या शाखा अभियंत्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील(सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक), पत्नी, मुलगा व दोन भाऊ व बहीण असा आप्त परिवार आहे. या घटनेने जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकारी वर्गांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. बढीये यांच्या मृत्यूमागे नेमके कोणते कारण आहे, याचा शोध जिल्हा परिषद प्रशासन घेईल काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. ‘जि.प.च्या शाखा अभियंत्याला ब्रेन हॅम्रेज’ या शीर्षकाखाली आज ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताबाबत अनेकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी संपर्क साधून वस्तुस्थिती पुढे आणल्याचे समाधान व्यक्त केले. बढीये यांचा नाहक बळी गेला, असेही ते बोलत होते.(जिल्हा प्रतिनिधी)राजकारणाची पातळी खालावलीसुस्वभावी, सर्वांशी मिळून मिसळून काम करणारा अधिकारी म्हणून संजय बढीये हे जिल्हा परिषदेत परिचित होते. जो भ्रष्टाचार करतो. त्याच्यावर भ्रष्टाचाराचे वा अन्य कितीही आरोप लागले तरी ते निर्ढावल्यागत वावरतात. बढीये हे त्यातले असते तर त्यांनाही अशापद्धतीने अपमानित करणारी बाब असह्य झाली नसती. ते ज्या विभागात कार्यरत होते. त्या विभागातील कोणत्याही भ्रष्टाचारात त्यांचा हात असल्याची कुठलीही बाब पुढे आली नसताना केवळ घाणेरड्या राजकारणातून आपला उल्लू सरळ करण्यासाठी त्यांच्यावर नाहक आरोप केल्या गेले, यात त्यांचा बळी गेला, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चिली जात आहे.