शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचाराचा दोन ते अडीच वर्षानंतर मिळतोय परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय उपचाराचा परतावा मिळण्याकरिता कार्यरत असलेल्या विभागाकडे प्रस्ताव पाठविले जातात. सुरुवातीला कागद पत्रांची पूर्तता करतांनाच मोठ्या अडचणी येतात. त्यानंतरही प्रस्ताव चार टेबलांवर जात असल्याने मोठा कालावधी जातो. मंजुरी मिळाल्यावरही निधीअभावी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना दफ्तर दिरंगाईचा फटका

 लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय कर्मचाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांना शासनाकडून वैद्यकीय उपचारांचा परतावा दिला जातो. पण, प्रस्ताव सादर केल्यानंतर कर्मचाऱ्यांना तब्बल दोन ते अडीच वर्षांपर्यंत बिलच मिळत नसल्याचा प्रकार जि.प. मध्ये दिसून आला आहे. जि.प. अंतर्गत आठही तालुक्यामध्ये जवळपास ५ हजार ५०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यात सामान्य प्रशासन, समाज कल्याण, शिक्षण, पशुसंवर्धन, पंचायत, महिला व बालकल्याण, वित्त व लेखा, आरोग्य, लघू सिंचन, कृषी, बांधकाम व पाणीपुरवठा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांनी परिवारातील सदस्याच्या किंवा स्वत: च्या वैद्यकीय  उपचाराच्या परताव्यासंदर्भात प्रस्ताव सादर केल्यानंतर विविध कारणांमुळे दोन ते अडीच वर्षे परतावा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.

मंजुरीनंतरही राहतोय निधीचा अभावजिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय उपचाराचा परतावा मिळण्याकरिता कार्यरत असलेल्या विभागाकडे प्रस्ताव पाठविले जातात. सुरुवातीला कागद पत्रांची पूर्तता करतांनाच मोठ्या अडचणी येतात. त्यानंतरही प्रस्ताव चार टेबलांवर जात असल्याने मोठा कालावधी जातो. मंजुरी मिळाल्यावरही निधीअभावी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते.जिल्हा परिषदमध्ये कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी स्वत: च्या किंवा परिवारातील सदस्यांच्या वैद्यकीय उपचाराच्या परताव्या संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. काहींना तब्बल अडीच वर्षानंतर परवातावा मिळाता तर काहींना दोन वर्ष लोटूनही परतावा मिळाला नाहीत. पण, कुणाकडूनही तक्रार नाही, हे विशेष.

बिलाकरिता फाईलचा चार टेबलांवरून प्रवासकर्मचाऱ्याला प्रारंभी तो कार्यरत असलेल्या विभागात प्रस्ताव सादर करावा लागतो. कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर प्रस्ताव आरोग्य विभागात जातो. त्यानंतर वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्यावर बिल देण्याचा आदेश कार्यरत असलेल्या विभागास प्राप्त होतो.

कर्मचाऱ्यांना तात्काळ वैद्यकीय उपचाराचे बिल देण्याचा प्रयत्न असतो. पण, प्रस्ताव सादर करतांना कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पुर्तता केलेली नसते. किंवा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित विभागात निधीची कमतरता असते, त्यामुळे कधीकाळी विलंब होतो.                         - डॉ. सचिन ओम्बासे,                           मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्य