शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रेमाच्या मोहात, अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकतेय तरुणाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 18:01 IST

Wardha : मोहिनी घालण्याचेही प्रकार सुरू असून यासाठी पावडरचा उपयोग केला जातो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ती मला पाहिजेच, काहीही झाले तरी मी प्रेम प्रकरणात यशस्वी झालोच पाहिजे, अशा मोहामुळे प्रेमवेडे अनेक तरुण सध्या भोंदूबाबांच्या मायाजालात अडकत चालले आहेत. तिला पटविण्यासाठी या मंत्राचा जप करा, तिचे नाव लिहून तिचा फोटो झाडाला लटकवा, विशिष्ट वस्त्र किंवा केस मिळवून पूजा करा असे अनेक विचित्र अघोरी उपाय भोंदूबाबांकडून तरुणाईला सुचवले जात आहेत. हे सारे चित्र वर्धा जिल्ह्यात सुरु आहे.

शहरालगतच्या ग्रामीण भागात अशा भोंदू बाबांचा अक्षरश सुळसुळाट सुरु आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात भोंदू बाबांची पॉवर चांगलीच वाढली आहे. अगदी बैलगाडी, घोडागाडी, श्वान शर्यत जिंकण्यापासून ते प्रेम प्रकरणात यशस्वी होण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींवर अघोरी उपाय या बाबांकडून सुचवले जात आहेत.

शर्यतीत फोनवरून वशीकरण मंत्रसध्या तर बैलगाडा शर्यत अंधश्रद्धेच्या मगरमिठीत अडकली आहे. आपला बैलच जिंकावा, यासाठी शर्यत सुरू होताच भोंदूबाबाला फोन लावला जातो. प्रतिस्पर्धी बैलाचे नाव सांगितले जाते. आपल्या पुढे किती गाड्या आहेत, आपल्या मागे किती गाड्या आहेत ही सर्व माहिती दिली जाते. यानंतर बाबांकडून सूचना दिल्या जातात.

रुमाल टाकताच बैल जाग्यावर बसण्याचा दावासध्या वाड्या-वस्त्यांपासून ते अगदी शहरांपर्यंत बैलगाडा, शर्यतींची क्रेझ आहे; मात्र या शर्यतींना देखील भोंदूबाबांनी अंधश्रद्धेचे ग्रहण लावले आहे. रुमाल टाकताच बैल जाग्यावर बसणारच, असे चॅलेंज या भोंदूंकडून दिले जाते. त्यामुळे असल्या भोंदूबाबांना चार-पाचशे रुपये द्यायचे, बैलावरून लिंबू ओवाळून टाकायचा, शर्यतीच्या मैदानावर प्रतिस्पर्धी बैलाच्या नावाने नारळ फोडणे, अंगारा फुंकणे, लिंबू ओवाळून फेकण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत.

भोंदू पॉवरमुळे स्मशानभूमीवर सीसीटीव्ही बसविले कॅमेरे

  • शहराजवळच्या गावांमध्ये भोंदूबाबांची पॉवर सध्या चांगलीच वाढली आहे.
  • अघोरी कृत्यांमुळे गावकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. ठरावीक दिवशी तर इतकी गर्दी होते की, गावात पाय ठेवायला जागा नसते.
  • स्मशानभूमीत अघोरी कृत्य होत असल्याने काही गावातील तसेच शहरातील स्मशानभूमीत अक्षरश सीसीटीव्ही बसविण्याची वेळ आली आहे.

गेल्या पाच वर्षात झाले जिल्ह्यात नऊ गुन्हे दाखलभोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. मागील पाच वर्षात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा २०१३ अन्वये विविध पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

"लिंबू उतरवून टाकणे किंवा फोटो झाडाला टांगणे या साऱ्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत. असे प्रकार करणाऱ्या भोंदू बाबांची भोंदूगिरी मोडून काढण्याची गरज आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी त्वरित कारवाई केली पाहिजे. ग्रामीण भागात शिक्षण, चर्चा आणि प्रबोधनातून या प्रकारावर मात करण्याची गरज आहे."- पंकज वंजारे, राज्य युवा संघटक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती. 

टॅग्स :wardha-acवर्धा