शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

इंझापूर येथे आपचे जेलभरो

By admin | Updated: August 14, 2016 00:12 IST

आम आदमी पार्टी व गाव बचाव संघर्ष समिती भूगावच्यावतीने उत्तम गलवा कंपनीमार्फत सर्व ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा ....

८३ आंदोलकांची अटक व सुटका : शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी वर्धा : आम आदमी पार्टी व गाव बचाव संघर्ष समिती भूगावच्यावतीने उत्तम गलवा कंपनीमार्फत सर्व ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा करावा यासह अन्य मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी टी-पॉर्इंट इंझापूर येथे रास्ता राको व जेलभरो आंदोलन केले. यावेळी सुमारे ८३ आंदोलकांची अटक व सुटका करण्यात आली. उत्तम गलवा या कंपनीतून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे भूगावसह परिसरातील गावांत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे या सांडपाण्याचा निचरा थांबवावा. रासायनिक पाण्याचे शुद्धीकरण करून तेच पाणी कंपनीने पुन्हा वापरावे. प्रदूषणाने जमिनीचा पोत घसरला वर्धा : कंपनीने दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीची पोत रासायनिक पाणी व धुलकणांमुळे उतरली आहे. यामुळे पीक उत्पादकता १० ते २० टक्क्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना जमिनीची पोत ठिक होईपर्यंत वार्षिक २५ हजार रुपये हेक्टरी मोबदला द्यावा. स्थानिक युवक-युवतींना शैक्षणिक पात्रतेनुसार त्वरित नोकरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शासन नियम व कंपनीला मान्य करारानुसार ८० टक्के ग्रामस्थ व वर्धा जिल्ह्यातील युवक, युवतींना नोकरी द्यावी. परिसरातील गावांत स्थायी आरोग्य सेवा सीएसआर फंडातून मोफत द्यावी. कंपनीच्या चिमणीची उंची २७५ मिटर करावी. कंपनी ३०० ते ५०० पीपीएम धुळ दररोज वातावरणात सोडते. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कार्यवाही करावी. कंपनीचे पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण काढावे. रस्ते मोकळे करावे, आदी मागण्या लावून धरल्या आहेत. आंदोलनात आप व गाव बचाव संघर्ष समितीचे रवींद्र साहु, देवेंद्र वानखेडे, भुगावच्या सरपंच प्रिया उगेमुगे, माजी सरपंच अनुसया आत्राम, ग्रा.पं. सदस्य पुष्पा वानखेडे, प्रिया उरकुडे, आरती ढुमणे, महादेव धोपटे, प्रमोद भोयर, अजीत इंगोले, मंगेश शेंडे, प्रमोद भोमले, बाबूजी ढगे यासह नागरिक सहभागी झाले होते.(कार्यालय प्रतिनिधी)