शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

ठाण्यातून अल्पवयीन मुलासह युवतीचे पलायन, वर्ध्यात घेतला आश्रय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 18:16 IST

लिव्ह इन रिलेशनशिपचा करार : संपूर्ण कुटुंबाचेही केले समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अल्पवयीन मुलाचे त्याच्यापेक्षा चार वर्षे मोठ्या युवतीशी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कुटुंबियांना माहिती पडताच विरोध सुरू झाला. यावर तोडगा म्हणून दोघांनीही ठाण्यातून पलायन करून मध्यस्थांच्या मदतीने वर्धा गाठले. युवतीच्या शोधात पोलिस आणि मुला-मुलीचे कुटुंब वर्धा येथे पोहोचले. येथे सखी वनस्टॉपच्या मदतीने दोन्ही कुटुंबांचे मनोमिलन घडवून आणून पुढील होणारा अनर्थ टाळला गेला.

ठाणे येथील रहिवासी वृषाली नामक २४ वर्षांची तरुणी तर वाशिम जिल्ह्यातील २० वर्षांचा अल्पवयीन युवक रितेश कामानिमित्ताने गोरेगाव येथे मामाच्या मदतीने पोहोचला. तिथेच वृषालीसोबत त्याची ओळख झाली. त्यांच्यात मित्रता वाढली, भेटीगाठी वाढल्या. यातच त्यांचे सूत जुळले. सोबत एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. पण मुलाचे वय, शिक्षण, गरिबी ही समस्या निर्माण झाली. वृषालीच्या कुटुंबाकडून याला विरोध होऊ लागला. यावर उपाय म्हणून दोघांनीही पळून जाऊन लग्न करून एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. 

१२ नोव्हेंबरला ठाण्यातून पळ काढला. इकडे तिकडे काही दिवस घालविले. पण समाजातील वास्तव समोर आले. इज्जत, आबरू सुरक्षित नाही याची जाणीव झाली. सुरक्षित स्थळ शोधताना ओळखीच्या रवि नागपुरे याच्या मदतीने त्याच्या ओळखीच्या व बहीण मानलेल्या पठाण या मुस्लिम महिलेने दोघांनाही मदत करण्याचे ठरवून त्यांना वर्धा येथे आश्रय दिला. तिकडे १३ नोव्हेंबरला मुलीच्या आईवडिलांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात मुलगी पळवून नेल्याची तक्रार नोंदवली. पोलिस सक्रिय होत आश्रय देणाऱ्याचा शोध घेत पोलिस वर्धा येथे मुला-मुलीच्या कुटुंबियांसोबत दाखल झाले. 

'अंनिस'च्या पुढाकाराने प्रेमवीरांचे मनोमिलन

  • घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गजेंद्र सुरकार यांना मिळाली. त्यांनी दोन्ही प्रेमवीरांचे समुपदेशन केले. गजेंद्र सुरकार यांना पोलिसांचा फोन आला. रितेश व वृषाली यांचे लग्न केल्यास कायदेशीर कारवाई होईल, अशी तंबी दिली. 
  • अशा प्रकरणात भविष्यातील धोका लक्षात घेता पोलिस कारवाई टाळण्यासाठी मुलीला सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सखी वन स्टॉपला मदत मागितली. मुलीला सेंटरला सुरक्षा दिली.
  • घटनेची माहिती पोलिसांना दिली. ३० नोव्हेंबरला पोलिस कर्मचारी भूषण महाजन व दोन्ही कुटुंब एकत्रित आले. दोघांचेही समुपदेशन करून दोघांचेही लग्न लावून देण्याचा निर्णय झाला.

पलायन करताच केला लिव्ह इन रिलेशनशिपचा करार पोलिस कारवाईची शक्यता असल्याने दोघांनीही पलायन करताच लिव्ह इन रिसेशनशिपचा दोघांत करार करण्यात आला. गजेंद्र सुरकार व रेश्मा रघाटाटे यांनी त्याला प्रतिसाद देत मुलाचे लग्नाचे वय २१ झाल्याबरोबर त्यांचे लग्न लावून देण्याचे ठरविले. मुलीला रितेशच्या आईने सर्वांसमोर स्वीकारण्याचे वचन दिले. मुलीच्या वडिलांनी व आईनेही लग्न लावून देण्याचा शब्द सर्वांसमोर दिला. दोघांनीही लग्न होईपर्यंत कायदेशीर करार करून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे दोन्ही कुटुंब यांच्या सहमतीने ठरविले. यावेळी आय. टी. स्टॉपचे प्रमुख शेषराव राठोड, परिचारिका शुभांगी दुपारे, सुरक्षारक्षक आशिष भरणे यांनी सहकार्य केले.

"कुटुंब व्यवस्था टिकून राहणे महत्त्वाचे आहे. मुलाला २१ वर्षे पूर्ण व्हायला एक महिना वेळ आहे. समुपदेशातून दोन्ही कुटुंबियांना समज देण्यात यश आल्याने मुलीचे माहेर कायम राहणार आहे. सध्या शहरात दोघेही एकत्र राहत आहेत." - रेश्मा रघटाटे, केंद्र प्रशासक, सखी वन स्टॉप सेंटर वर्धा.

टॅग्स :wardha-acवर्धा