शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

‘खाकी’च्या हद्दीत अडकला रेल्वे अपघातातील जखमी युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 15:54 IST

पश्चिम बंगाल येथील दक्षिण दिनाजपूर येथील रहिवासी सुजित लारका हा कामाच्या शोधात अहमदाबाद येथे रेल्वेने जात होता. दरम्यान, पुलगाव रेल्वेस्थानकनजीक तो रेल्वेतून खाली पडला.

ठळक मुद्देतीन दिवसांपासून अन्नपाणी बंद अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट

वर्धा : ‘खाकी’च्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत रेल्वे अपघातात जखमी झालेली व्यक्ती अडकली असून, मागील तीन दिवसांपासून ती व्यक्ती पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात पडून आहे. मात्र, आरपीएफसह लोहमार्ग आणि पुलगाव पोलिसांनी ‘हद्दी’चे कारण पुढे करत जखमीला पुढील उपचारासाठी न नेता तेथेच सोडून दिले असून, अधिकारी आता एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहेत.

पश्चिम बंगाल येथील दक्षिण दिनाजपूर येथील रहिवासी सुजित लारका हा कामाच्या शोधात अहमदाबाद येथे रेल्वेने जात होता. दरम्यान, पुलगाव रेल्वेस्थानकनजीक तो रेल्वेतून खाली पडला. तो गंभीर जखमी झाला होता. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी उपस्टेशन प्रबंधकांच्या तक्रारीवरुन जखमी युवकाला पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी वर्धा येथील रुग्णालयात रेफर केले. मात्र, आरपीएफचे जवान रुग्णालयातून निघून गेले होते. त्यामुळे जखमी व्यक्तिला कोण रुग्णालयात नेईल, हा प्रश्न पडला आहे. मात्र, पुलगाव पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ आपली जबाबदारी झटकून एकमेकांच्या हद्दीकडे बोट दाखवत असल्याचे दिसून येत आहे.

तीन दिवसांपासून ‘तो’ उपाशीच

सुजित गंभीर जखमी झाल्याने उठून बसूही शकत नाही. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्याच्या नातलगांना माहिती देणे आवश्यक होते. पण, तसे केले नाही. त्यामुळे त्याची जबाबदारी कुणाची, जर त्याचा मृत्यू झाला तर कोण जबाबदार, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

अधिकाऱ्यांनी झटकले हात

पुलगाव येथील आरपीएफ अधिकारी कनौजे यांना विचारले असता जखमीला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आमची आहे. त्यानंतर ही जबाबदारी लोहमार्ग पोलिसांची असल्याचे सांगितले. लोहमार्ग पोलीस अधिकारी दयानंद सरवदे यांनी ७२७ ते ७२९ कि. मी.पर्यंतचे क्षेत्र आमच्या हद्दीत येत असल्याचे सांगून त्यांनी पुलगाव पोलिसांना माहिती देणे आवश्यक होते. आम्हाला सांगितले असते तर आम्ही काहीही करु शकलो असतो, असे ते म्हणाले.

पुलगाव आरपीएफकडून नेहमीच असे प्रकार होतात. जखमींना रुग्णालयात आणून साेडून देतात. ना नाव, ना पत्ता सांगितला जात. दुसऱ्या दिवशी साधी विचारपूस करण्यासही येत नाहीत. रुग्णालयाकडून ठाणेदारांना पत्र पाठवून योग्य उपचार न झाल्यास सुजितचा जीवही जाऊ शकतो, असे सांगितले आहे. मात्र, कुठलेही उत्तर मिळालेले नाही.

गोपाल नारळवार, वैद्यकीय अधीक्षक, पुलगाव.

टॅग्स :Healthआरोग्यrailwayरेल्वे