शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘खाकी’च्या हद्दीत अडकला रेल्वे अपघातातील जखमी युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 15:54 IST

पश्चिम बंगाल येथील दक्षिण दिनाजपूर येथील रहिवासी सुजित लारका हा कामाच्या शोधात अहमदाबाद येथे रेल्वेने जात होता. दरम्यान, पुलगाव रेल्वेस्थानकनजीक तो रेल्वेतून खाली पडला.

ठळक मुद्देतीन दिवसांपासून अन्नपाणी बंद अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट

वर्धा : ‘खाकी’च्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत रेल्वे अपघातात जखमी झालेली व्यक्ती अडकली असून, मागील तीन दिवसांपासून ती व्यक्ती पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात पडून आहे. मात्र, आरपीएफसह लोहमार्ग आणि पुलगाव पोलिसांनी ‘हद्दी’चे कारण पुढे करत जखमीला पुढील उपचारासाठी न नेता तेथेच सोडून दिले असून, अधिकारी आता एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहेत.

पश्चिम बंगाल येथील दक्षिण दिनाजपूर येथील रहिवासी सुजित लारका हा कामाच्या शोधात अहमदाबाद येथे रेल्वेने जात होता. दरम्यान, पुलगाव रेल्वेस्थानकनजीक तो रेल्वेतून खाली पडला. तो गंभीर जखमी झाला होता. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी उपस्टेशन प्रबंधकांच्या तक्रारीवरुन जखमी युवकाला पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी वर्धा येथील रुग्णालयात रेफर केले. मात्र, आरपीएफचे जवान रुग्णालयातून निघून गेले होते. त्यामुळे जखमी व्यक्तिला कोण रुग्णालयात नेईल, हा प्रश्न पडला आहे. मात्र, पुलगाव पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ आपली जबाबदारी झटकून एकमेकांच्या हद्दीकडे बोट दाखवत असल्याचे दिसून येत आहे.

तीन दिवसांपासून ‘तो’ उपाशीच

सुजित गंभीर जखमी झाल्याने उठून बसूही शकत नाही. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्याच्या नातलगांना माहिती देणे आवश्यक होते. पण, तसे केले नाही. त्यामुळे त्याची जबाबदारी कुणाची, जर त्याचा मृत्यू झाला तर कोण जबाबदार, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

अधिकाऱ्यांनी झटकले हात

पुलगाव येथील आरपीएफ अधिकारी कनौजे यांना विचारले असता जखमीला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आमची आहे. त्यानंतर ही जबाबदारी लोहमार्ग पोलिसांची असल्याचे सांगितले. लोहमार्ग पोलीस अधिकारी दयानंद सरवदे यांनी ७२७ ते ७२९ कि. मी.पर्यंतचे क्षेत्र आमच्या हद्दीत येत असल्याचे सांगून त्यांनी पुलगाव पोलिसांना माहिती देणे आवश्यक होते. आम्हाला सांगितले असते तर आम्ही काहीही करु शकलो असतो, असे ते म्हणाले.

पुलगाव आरपीएफकडून नेहमीच असे प्रकार होतात. जखमींना रुग्णालयात आणून साेडून देतात. ना नाव, ना पत्ता सांगितला जात. दुसऱ्या दिवशी साधी विचारपूस करण्यासही येत नाहीत. रुग्णालयाकडून ठाणेदारांना पत्र पाठवून योग्य उपचार न झाल्यास सुजितचा जीवही जाऊ शकतो, असे सांगितले आहे. मात्र, कुठलेही उत्तर मिळालेले नाही.

गोपाल नारळवार, वैद्यकीय अधीक्षक, पुलगाव.

टॅग्स :Healthआरोग्यrailwayरेल्वे