शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

देशभक्ताची शौर्यगाथा युवा पिढीला कळावी

By admin | Published: August 18, 2016 12:47 AM

देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या देशभक्तांचा युवकांना विसर पडत आहे.

रामदास तडस : तिरंगा जनसंवाद यात्रा पुलगाव : देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या देशभक्तांचा युवकांना विसर पडत आहे. त्यामुळे आजच्या युवा पिढीला स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांची शौर्यगाथा माहीत व्हावी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या देशभक्तांच्या बलिदानाची ज्योत सतत त्यांच्या मनात तेवत राहावी यासाठीच ही तिरंगा जनसंवाद यात्रा असल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. पुलगाव शहरात मंगळवारी आलेल्या भाजपाच्या तिरंगा जनसंवाद यात्रेच्या स्वागत प्रसंगी ते बोलत होते. दीनदयाल चौकात आयोजित कार्यक्रमाला माजी खा. सुरेश वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, जि. प. माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, शहराध्यक्ष मंगेश झाडे, सुनील गफाट, नितीन बडगे, संजय गाने, साबिर कुरेशी, बाळा जगताप, कपील शुक्ला उपस्थित होते. सदर तिरंगा जनसंवाद यात्रा आगरगाव, नाचनगाव मार्गे रात्री ८ वा. शहरात मुख्य मार्गाने भ्रमण करून स्व. दीनदयाल चौकात पोहचल्यावर यात्रेचे स्वागत करण्यात आले. २०० मोटर सायकलचा ताफा यात्रेत सहभागी होता. प्रास्ताविक मंगेश झाडे यांनी केले. नगरसेविका रंजना कडू, माधुरी इंगळे, दुर्गा व्यास, आशिष गांधी, मधुकर रेवतकर, सुरेश सुखिजा यावेळी उपस्थिती होते. १७ आॅगस्टला सकाळी गुंजखेडा मार्गे यात्रेने प्रस्थान केले. संचालन अविनाश भोपे तर आभार दुबे यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)